All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Sunday, December 1, 2013

Sachin Tendulkar...




                     क्रिकेट म्हणजे सचिन हे सर्वमान्य समीकरण बनले आहे. सचिनचा सामना पाहणे ही पर्वणीच असायची . जी मी देखील अनुभवली आहे .हल्लीच झालेल्या IPL स्पर्धांमधील MI V/s RCB सामना डोळ्यात साठवून ठेवला आहे , सचिनला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचा अविस्मरणीय आनंद घेता आला. सचिन मैदानात जरी आला ना मग ते प्रत्यक्ष खेळायला असो वा सराव असो, सचिन !!! सचिन !!! घोषाने स्टेडीयम दणाणून जाते. अंगावरच लव पेटून उठावे तसे रोम रोम जोशाने भरून उठते. प्रत्यक्ष हा अनुभव हजारो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडीयममध्ये घेतल्यानंतरच तुम्हाला कळेल. पण आता सचिन नसेल खेळायला असतील त्या फक्त त्याच्या आठवणी. आणि आठवणी कधीच रिटायर होत नाहीत. सचिन ने जेव्हा एकदिवसीय सामन्यात २०० केले तेव्हा त्याच्या गौरव प्रित्यर्थ एक कविता केली होती.

कधी शांत तर कधी खवळलेला…
आरसा हा समुद्राचा,
कधी  नम्र तर कधी कठोर…
स्वभाव या व्यक्तिमत्वाचा.

कधी गुणी शिष्य एका गुरूचा…
तर कधी गुरु हा नवोदितांचा,
कधी अपयशी तर कधी विजयी…
बादशाह हा विक्रमांचा.

दिसत असला लहान साधा तरी…
काळ सगळ्या गोलंदाजांचा,
निरंतर खेळत रहा तू सदैव…
हाच निरोप आहे प्रत्येक चाहत्याचा.

सातासमुद्रापार घेवून गेलास मराठीचे नाव…
हा परिणाम आहे तुझ्या विक्रमांचा,
ओळखायला क्षण आहे पुरेसा…
कारण तसा प्रवास आहे आपल्या सचिनचा.

सचिन तेंडूलकरचा असेल…
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान,
क्षितिजावर चमकणाऱ्या ताऱ्यासम…
सदैव असेल त्याचा सम्मान  - हर्षद कुंभार.          

  सचिनसम तोच, दुसरा सचिन होणे नाही…विविध वाक्यांनी सन्मानित कारकीर्द असलेला सचिन घरातला कोणी एक वाटतो. त्याच शांत आणि नम्र बोलन लक्ष वेधून घेते. सामान्य व्यक्तीमत्व असामान्य ओळख. अशी ओळख त्याच्या कारकिर्दीतल्या कर्तुत्वाने निर्माण केली आहे. त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेछ्या- हर्षद कुंभार                            

  

Saturday, October 26, 2013

रूढी -परंपरा , प्रथा संस्कार याला नवीन आधुनिक विज्ञानाची जोड देयला हवी



          एक गोष्ट जी सगळ्यांना काही गोष्ठीची अनुभूती करून देईल. आपण कुठे चुकतोय याची , आपण कोणत्या तत्वांवर, नियमांवर संस्कारांवर आपली घडी बसवली आहे याची. लहानपणापासून खूप गोष्टींचा बाऊ करून आपल्यावर संस्काराचे बाळकडू दिले जातात. तेच पूर्ण सत्य मानून आपण मोठे होतो आणि पुढेही तीच परंपरा चालू ठेवतो . त्यामुळे मोठ्यांना का म्हणून विचारले की ते वैतागतात किव्वा जेव्हडे सांगितले आहे तेवढेच लक्षात ठेवा बाकी चांभार चौकश्या नकोत. अशी जरब बसवली जाते. कारण त्यांनाही त्यामागचे शास्त्र माहित नसते अर्थात त्यांनाही दोष देण्यात काय अर्थ ना. ही परंपरा अशीच चालत आली आहे आणि राहील पण कदाचित.
      असो मुळात आता जी गोष्ट मी सांगणार आहे त्याने तुमच्या विचारांत बदल झाला तरी मला पुरुसे आहे. तर ही गोष्ट मी पुण्यात असताना वाचनात आली होती .

       "काही अभ्यासकांनी केलाला एक अभ्यास आहे त्यावरून घडलेली गोष्ट …
एका पिंजऱ्यात ५ माकडांना ठेवलेले असते. अभ्यासक नियमित त्या माकडांना केळी खायला देत असत. नंतर मग काही काळानंतर अभ्यासक त्यांना खायला देयला बंद करतात आणि पिंजऱ्याच्या मध्यभागी एक शिडी ठेवतात आणि पिंजऱ्याच्या वरच्या बाजूला केळी लटकवलेली दिसतील अशी ठेवतात. माकडांना कुठे काही खायला मिळत नाही, मग इथे तिथे पाहून अखेर त्यांना  केळी दिसतात आणि ते शिडी चढून केळी मिळवतात. अश्या प्रकारे त्या ५ माकडांना शिडी चढून केळी खायची सवयच लागते.
     आता अभ्यासक त्यांच्या या रोजच्या जगण्यात थोडा बदल करतात जेव्हापण ती माकडे त्या शिडीवर चढतील ना तेव्हा गरम पाण्याचा फवारा पिंजऱ्यात करतात. त्यामुळे गरम पाण्याने थोडं भाजायचे त्या माकडांना. माकडांच्या विचारशक्तीने त्यांच्या हे लक्षात येते की शिडी चढले की गरम पाणी अंगावर पडणार. त्यामुळे ती ५ माकडे शिडी चढायचा आप आपसात कोणालाच प्रयत्न करून देत नसत.
   आता अभ्यासक त्या ५ मधील ३ माकडे काढून नवीन ३ माकडे ठेवतात. त्यामुळे जुनी २ आणि नवीन ३ अशी ५ माकडे ठेवतात. त्यामुळे आता होते काय की हि नवीन ३ माकडे केळी खाण्यासाठी त्या शिडीजवळ जरी गेली तरी जूनी  २ माकडे त्यांना मारायची. असे सारखेच होऊ लागले.  त्या नवीन ३ माकडांना कळून चुकते शिडीजवळ काहीतरी आहे पण काय ते माहित नाही फक्त शिडी चढायची नाही किव्वा जवळ पण जायचे नाही हे मनाशी पक्के करून घेतात आणि शिडीजवळ जायचा नाद सोडतात.
    आता अभ्यासक पुन्हा बदल करतात जुन्या २ माकडांना कडून नवीन २ माकडांना पिंजऱ्यात ठेवतात म्हणजे आता २ नवीन माकडे आधीची नुकतीच ३ थोडी जुनी माकडे. तर आता पिंजरयातल्या नियमानुसार ही ३ माकडे त्या २ नवीन माकडांना पण त्या शिडीजवळ जाऊ देत नाहीत. त्यामुळे आता ५ ही माकडांना काहीच माहित नाही की शिडी जवळ गेल्यावर नक्की काय होते ते. फक्त एवढाच ना की काहीतरी असेल कदाचीत तिथे."
   तेव्हा आता तुम्ही विचार करा की हीच गोष्ट आपल्यासोबत पण झालीच आहे की नाही ते. रूढी - परंपरा या अश्याच पुढे आपल्यापर्यंत आल्या आहेत. मुळात त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार त्या रूढी-परंपरा जन्माला आलेल्या किव्वा बनवलेल्या गेल्या आहेत हे का आपल्या लक्षात येत नाही.

उदाहरण देयचे झाले तर आजही आपली वडिलधारी लोक आपल्याला सांगतात कि रात्रीची नखे कापू नये. आता का कुणालाच जास्त माहितपण नसेल.
   माझ्या माहितीनुसार जुन्याकाळी प्रकाशासाठी फक्त सूर्य हा एकच स्रोत्त्र होता अर्थात आग होती पण कोणी आग लावून नखे तर कापणार नाही न रात्री . रात्री अंधाराने नखे कापताना बोटांना इजा होऊ नये आणि कापून टाकलेली नखे कोणाच्या पायाला लागू नये हा त्यामागील उद्धेश होता. म्हणून रात्री नखे कपू नये हा नियम म्हणा की संस्कार लागू झाला तो आजवर तसाच आहे. अर्थात आपण आता प्रकाशासाठी सूर्यावर अवलंबून नाही पण आहे ते तसेच आहे ना.
या आणि अश्याच खूप गोष्टी आजही समाजमान्य अस्तित्वात आहेत. माझ्या मते आता आपण आपल्या रूढी -परंपरा , प्रथा संस्कार याला नवीन आधुनिक विज्ञानाची जोड देयला हवी त्यांचा अर्थ स्पष्ठ करण्याकरता. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)  
         

Sunday, October 20, 2013

Ek Kavita


किस्मत पर रोते हुए…
लोग अच्छे नही लगते ,
हात की लकीरोपें चले रस्ते…
पक्के नही लगते.

सिर्फ़ सच्चे दिल की
आवाज सुना करो…
क्योंकी प्यार की राह के फैसले
दिमाग सें नही लिया करते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Saturday, October 12, 2013

नैसर्गिक आपत्तीसम… प्रेम




खोल गहिऱ्या महासागरासम  
शांत निष्क्रिय जरी मी असलो … 
मनातल्या प्रेमाच्या लाटा मात्र 
तिच्या मनापर्यंत थडकत असतात. 

नैसर्गिक आपत्तीसम… 
जणू प्रेमसदृश्य मनाच्या क्रिया,
जश्या कोणीही रोखू शकत नाही … 
त्या प्रेम विरोधींना हतबल करूनच सोडतात. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).


प्रेमाचा उर्जास्त्रोत ....





त्यांना काय वाटत … 
भौतिक प्रेमाचा उर्जास्त्रोत बंद केल्याने … 
प्रेम म्हणून जन्माला…  
आलेले रोप वाढणार नाही,

वेडे आहेत रे ते लोक…  
त्यांना काय माहित … 
माणसाचं मन… 
स्वतःच एक उर्जास्त्रोत असते. - - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).

Ek Kavita...


Ek Kavita - Harshad Kumbhar


Saturday, August 17, 2013

आयुष्य आपले जरी







आयुष्यात स्वप्नांच्या 
शर्यतीत कधी कधी… 
अश्या वळणावर येवून 
थांबावे लागते की … 

आयुष्य आपले जरी 
असले ना तरी… 
त्याला चावी देयला
दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Wednesday, July 24, 2013

-- मन विचारंचे वादळ… --




                                                               -- मन विचारंचे वादळ…  --




मन विचारंचे वादळ…  
सदा सोबत घेवून फिरते,
स्वतः वसवलेला किनारा… 
कधी अचानक उध्वस्त करते. 

पुन्हा नव्याने मग… 
मनच पुन्हा किनारा वसवते,
स्वतःच उध्वस्त करणार…  
परी त्यास माहित असते.  -   हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)   

Saturday, June 29, 2013

प्रेमाची पत्रिका .. Premachi Patrika


प्रेमाची पत्रिका .. Premachi Patrika


- Harshad Kumbhar

मन...



                                                                        मन...


अस्तित्वाच्या लढाईत…  
नेहमीच मन जिंकते,
हमरी तुमरीवर येत… 
शेवटी शरीरच झुकते. 

मनाचे लाड पुरवता…  
पुरती तारांबळ उडते,
भावनेच्या आहारी… 
कधी हसवते, कधी रडवते. - हर्षद कुंभार (Harshad  Kumbhar)

पाणावलेल्या डोळ्यात…



                                                                        पाणावलेल्या डोळ्यात…  


पाणावलेल्या डोळ्यात…  
अश्रूंनी काहूर माजलेला…  
जिथे भावनांना नाही जागा…  
तिथे स्वप्ने ती काय तरळनार. 

डोळ्यांची काजवे करून…  
रात रात जगलेली मने…
एकमेकांची आयुष्य गुंतवायला… 
वेळ तरी काय उरणार.  - हर्षद कुंभार (Harshad  Kumbhar)

Monday, June 24, 2013

प्रेम... Prem


                                                                  


                                                             प्रेम... Prem



विश्वासाच्या नात्याला … 
विश्वासाची गरज असते,
प्रेमाने पेरलेल्या बीजाला … 
प्रेमळ मायेची ऊब लागते. 

                                        साथ आयुष्यभर मिळायला … 
                                        साथ एकमेकांची हवी असते. 
                                        दुरावलेल्या मनाला…     
                                        दूरअसूनपण प्रेमाची आस असते.  - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Saturday, May 18, 2013

गिलीची क्रिकेटमधून अखेर सांगता

गिलीची क्रिकेटमधून अखेर सांगता 

        गिलख्रिस्ट एक असे नाव ज्याने विकेट कीपर या नावाभवती आपल वलय तयार केले होते. आस्ट्रेलिया मधून खेळणारा जरी गिली असला तरी जगभर तो लोकांचा चाहता होता हे सर्वाना माहित असेल , कारण तो खेळाडू सोबत एक चांगला प्रतिस्पर्धी म्हणून नावाजलेला होता. आक्रमक फलंदाजी आणि उत्तम 
यस्टीरक्षण याचे समतोल उदाहरण म्हणजे गिली.   
       आज गिलीबद्दल लिहाव वाटल कारण IPL चा  आज पंजाब आणि मुंबईचा सामना झाला . जो कि गिली चा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीतला अखेरचा सामना होता. क्रिकेट कारकिर्दीत ज्याने Ball फक्त यस्टी मागे हातात घेतला आजवर, पण त्याने आयुष्यात प्रथमच गोलंदाजी करून पहिल्याच चेंडूवर बळी पण मिळवला. विलक्षण असा क्षण काहीसा भावनाप्रधान पण झाला. गिलीच्या या गोलंदाजीमुळे आज मला लिहावं असे वाटल त्यामुळे हा छोटासा लेख.  गिलीला आपण सगळे नेहमीच मिस करू.  - हर्षद कुंभार 

Sunday, March 17, 2013

मन शांत आहे


मन आजकाल इतकं
शांत आहे कि…
कसलीच तक्रार त्याला
नाही तिच्याकडून…

जेव्हा उदास असतं
हे मन तेव्हाच लिहिते…
तेव्हाचं शब्दांच्या
मागे धावते…

मनातली चलबिचल
तुमच्यापुढ मांडते…
भावनांची घुसमट
मनातून काढते…

पण आज ते शांत
जणू तरंगरहित पाणी…
न कसली चिंता कि
कसली आसक्ती मनी…  - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Saturday, February 9, 2013

- बालक - पालक अर्थात BP. -

 - बालक - पालक  अर्थात BP. -

काल हा चित्रपट पाहण्याचा योग आला. कालपर्यंत जे काही या चित्रपटाबद्दल ऐकले , वाचले ते खरंच अनुभवले.
म्हणतात ना तुमचे बालपण तुम्हाला नेहमी खुणवत असते आणि चिडवत देखील , कारण गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असच आपण नेहमी म्हणत असतो. आपल्या बालपणाशी साधर्म्य साधणारे काही तुम्हाला दिसले किव्वा वाचण्यात आलं की कसं छान वाटत ना. जेव्हा शाळा चित्रपट पाहिला तेव्हापण असच काहीसं झालं होत आणि तेव्हाही जुन्या आठवणींचे गलबत काळाच्या पडद्यामागं अलगद तरंगत गेल होत. 
" बालक पालक " विषय अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा. म्हणजे बालक आणि पालक यांना लैंगिकते 
बद्दल मोकळेपणाने बोलावे या बद्दल अजूनही धीर होत नाही म्हणा किव्वा तसे माध्यम नाही. चित्रपटात जे दाखवले अगदी तसच काही घडत नाही पण त्याच्याशी मिळते -जुळते असे घडलेले असते. सगळ्यांना ते आठवलेच असेच त्यांनी केलेले उपद्व्याप नाही का ?. आमच्या वेळेस पण नेट किव्वा मोबाईल इतका प्रचलित नव्हता. त्यामुळे प्रश्नही आमचेच आणि उत्तरेही आमचीच. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात "विशू" नावाचं पात्र पण असेल. ज्या त्या काळात मुलांनी अश्या प्रश्नांवर स्वतः आणि कुवतीप्रमाणे शोधलेली उत्तरे आहेत आणि असतील. त्या काळातलं निभावल आम्ही आणि आधीच्या पिढ्यांनी. 
पण आताची पिढी आणि नंतर येणारी पिढी त्याचं काय. त्यांना कुणीतरी हे नाजूक वळण सावधगिरीने आणि संयमाने कसे पार पाडायचे ते कोण सांगेन ही जबाबदारी नवीन पालकांवरच आहे ना.  तेव्हा मुलांसोबत लहानपणापासूनच मित्रवत राहा,
वागा म्हणजे ते न घाबरता तुमच्याशी सवांद साधू शकतील नाही का ? मुलाचं वयात येण पालकांना जाणवत नाही अस आहे काही नाही ना, मग आपल्या मुलांकडे आपल्यालाच पहाव लागणार ना. तुमच्या बाबतीत जे घडले ते त्यांच्या बाबतीत घडू नये म्हणून पालकांना नव्या पिढी सोबत जुळत घ्यावं लागेल. विचारात फरक पडला की माझ्या लेखाचं चीज झालं असे मी समजेन 
हं पण तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि जर तुम्ही पालक असाल त्याच वर्गवारीत मोडणारे तर आपल्या पाल्याला सोबत घेवून जा. - हर्षद कुंभार   
      

Sunday, January 27, 2013

एका ताऱ्याची भेट....

एका ताऱ्याची भेट....
 
मुंबई मध्ये राहणाऱ्या सर्वांनी कधी ना कधी एका तरी एकदातरी सेलेब्रेटीला पाहिलं असेल. तसं मीपण पाहिलंय पण ही भेट वेगळीच होती.
तर किस्सा असा आहे...
दिनांक : १७ - ०१ २०१३      
वेळ : ११.०० - ११.३० सुमारास 
ठिकाण : गोरेगाव (पूर्व)  हब मॉलच्या मागील रोड.

           मी आणि माझे ऑफिसचे मित्र रोजनिशीप्रमाणे चहा पिण्यासाठी आलो होतो. त्याच रोड लगत चहाची टपरी आहे. तर आम्ही चहा घेत निव्वळ ऑफिसच्या महत्व नसलेल्या गोष्टींवर बोलत असताना एक गाडी आमच्या जवळ येवून थांबली. त्या गाडीतील व्यक्तीने आम्हाला हटकून 
एका पत्त्याबद्दल विचारणा केली. अर्थात ती व्यक्ती त्या रोडवरील जवळचा एक पत्ता विचारत होती. आम्ही ५ मित्रांमधील मी आणि अजून एका मित्राने त्यांना प्रतिसाद दिला. माझा मित्र त्यांच्याशी बोलत असताना मला मात्र एक कोडं पडल यार यांना कुठेतरी पाहिलंय. आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला 
आणि थोडा पुढ होत त्यांना विचारलं तुम्ही " आशिष पवार " ना ? आणि त्यांनी " हो ". अरे सॉलिड म्हंटल आणि त्यांच्याशी हस्तांदोल करून त्यांना 
नेमका पत्ता सांगितला आम्हाला जितका माहित होता. ते एका चित्रीकरण स्तळाबद्दल विचारत होते. ते घाईत असल्याने लगेच गेले. आणि आमचा ऑफिस चा तो विषय सोडून मग आम्ही "आशिष पवार " बद्दल बोलू लागलो, अर्थात जे लोक E -TV  वरील " Comedy Express " बघत असतील त्यांना कळले असेल " आशिष पवार " कोण आहे ते. पण छान वाटले तेव्हा खरच मराठी नटांमध्ये विनोदी जगतात " आशिष पवार  " याचं नाव खूप मोठ आहे. आणि त्यांच्याशी झालेली ही अचानक भेट खूप सुखद होती. - हर्षद कुंभार