All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Sunday, October 25, 2015

तुम्ही एलियन आहात कोणाच्या तरी नजरेत

असचं टाईमपास म्हणून थोडंसं..... पण मजेशीर आहे.
गावाकडे किव्वा शहरात एक प्राणी असा आहे जो आपल्याला परग्रहवासी समजत असेल बहुदा. कारण त्यांच आपल्याकडे पाहत राहन असे असते की, आपल्याला संभ्रमात टाकत की आपण जणु काही त्यांच्या ग्रहावर आलोय. 
तुम्हाला अंदाज लावणं शक्यच नाही की मी कोणत्या प्राण्यांबद्दल बोलतोय. चला सांगतोच जास्त ताणत नाही उगाच. 
.
.
.
.
.
.
.
.
.

तो प्राणी म्हणजे खरंतर म्हणता येणार नाही कारण ती स्त्रीलिंगी आहे म्हणजेच " शेळी/बकरी ".

हो खरंच तुम्ही कधीपण पहा शेळीची आपल्याकडे पाहण्याची अदाकारी तशीच असते. एकदा निरीक्षण नक्की करुन पहा तुम्हाला एलियन होयच असेल तर.  - हर्षद कुंभार...

Friday, October 2, 2015

मार्ग नवा...

मनात खुप काही असतं,
पण सगळं अस्ताव्यस्त...
लिहायचं खुप असतं,
पण जुळलेलं काही नसतं...

वाट बदललेली जाणवते,
कारण पावलं मोजकीच पडतात...
स्वच्छंदी मन स्वैर,
पण मार्ग काही अडतात ...  - हर्षद कुंभार....

Saturday, August 15, 2015

पगारी शेतकरी एक संकल्पना ….

 पगारी शेतकरी एक संकल्पना ….


आज केंद्र आणि राज्य स्तरावर शेतकर्यांबद्दल फक्त सहानभूती दिसते . 
आपला देश हा शेतीप्रधान आहे. तरतूद म्हणून सरकार काय करते आपल्याला सगळ्यांना माहित अहे. फक्त Packege जाहीर केले की झाले, पण किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो हेपण  सर्वांना माहित आहे . हे सगळ असूनही गेली कित्येक वर्ष आपण ऐकतो आहे शेतकरी आत्महत्या करतातच .
भौगोलिक स्तिथी आणि  पावसावर अवलंबून असलेली शेती बेभरवशी आहे . शेती ही उत्पन्न आले तर आले नाहीतर पुढच्या वर्षी तरी नीट होईल या आशेवर चालू असते .

 मी खूप विचार केला आणि परिणामी एका उपायावर येवून विचार थांबला आणि तो  सर्वांपर्यंत पोचलाच पाहिजे असे मला वाटते निदान सरकार पर्यंत पोचून असे काही अमलात आणावे . भारतात प्रत्येक शेतकऱ्याला कमी-अधिक प्रमाणात शेती आहे.  कोणाला एकरी आहे कोणाला गुंठ्यावारी . सरकार ने त्याचे मापन करून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या सरासरी उत्पन्ना वरून एक पगार निश्चित करायला पाहिजे . म्हणजेच दरमह एक नियोजित पगार मिळत असल्याने त्यांचा  उदरनिर्वाह होईल आणि शेतीमधून उत्पन्न आहे त्यावर कर आकारून सरकारला ते  पैसे मिळतीलच जे की शेतकर्यांनाच पुन्हा  पगार स्वरुपात देता येईल . अर्थात कर हा उत्पन्नावर  असला तरी तो सक्तीचा नसावा कारण पावसाअभावी उत्पन्न आलेच नाही तर कर कसा भरणार . तसाही package स्वरुपात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून जो पैसा निर्धारित होतो  तो या संकल्पनेसाठी वापरता येईल . शेतकऱ्यांचा पगार बँकेत प्रत्यक्ष सरकारी खात्यातून जमा होयला पाहिजे . म्हणजे भ्रष्टाचाराचा  दंश या प्रणालीला होणार नाही . अर्थात हे सर्व किती प्रमाणात प्रत्यक्ष शक्य होईल काय माहीत . तुम्हाला हे कितपत योग्य वाटत  आणि जर चांगलं अजून काही यात जोडण्यासारख असेल तर नक्की सांगा .  - हर्षद कुंभार

Tuesday, August 11, 2015

जगण्याची क्रमवारी

कधी कधी काही दिवस
खुप अटीतटीचे असतात...
त्यामुळे जगण्याच्या क्रमवारीत
गोष्टींच प्राधान्य बदलावं लागतं.  - हर्षद कुंभार... 

Thursday, August 6, 2015

शिक्षण आणि आपण

आपली शिक्षण संस्था इतकी गोंधळात टाकणारी आहे की.... आपण शिक्षित होत असतो की अशिक्षित तेच कळत नाही....
म्हणजे बघा हां आपण एखादी पदवी संपादन केली तरी नोकरी मिळेल असे नाही काहीतरी वेगळे शिक्षण घ्यावेच लागते.  त्यापेक्षा जे चलनात आहे तेच का नाही शिकवत, वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. सरासरी वयाच्या २५  वर्षी कामाला लागतो आपण, पण मोजकेच आणि प्रमाणित शिक्षण घेतले तर किमान काही वर्षं आधी तरी कामाला सुरुवात होईल. त्यामुळे जीवनमानात कीती बदल होईल हे कळलं असेल तुम्हाला.  - हर्षद कुंभार... 

Tuesday, August 4, 2015

लोकशाहीचे धोरण

नमस्कार, 
आज मी एका धोरणाबद्दल बोलणार आहे.  संघटितपणे सामान्य माणूस काय बदल करू शकतो ते. अर्थात यात काय नविन आम्हाला पण माहीत आहे असं तुम्हाला वाटलं असेल. पण दोस्तहो मित्रांशी गप्पांच्या ओघात हे मला लक्षात आले. आपण फक्त सरकार किव्वा पुढारी या लोकांवर अवलंबून न बसता लोकशाही या संज्ञेचा योग्य रीतीने वापर करू शकतो. आपल्या सोयीचे असे आपल्या सभोवताली खुप काही बदलता येईल आपल्याला .  म्हणजेच लोकांना लोकांसाठी घडविलेल्या गोष्टी. 

एक उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील यशस्वीपणे राबविण्यात आलेला " पुणे बस डे ".  त्या दिवशी आपल्या सारख्या सामान्य लोकांनीच उत्तम प्रतिसाद देऊन एक इतिहास घडविला.  प्रायोगिक तत्त्वावर केलेला तो प्रयोग खुप काही बोलुन गेला. पण किती लोकांनी तो ऐकला आणि लक्षात ठेवला.  
महिन्यात एखाद्या दिवशी असा प्रयोग करायला हवा.  पुन्हा पुणे बस डे करायला काहीच हरकत नाही.  
तसंच अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या या पद्धतीने आपण अमलात आणु शकतो. 

उदाहरणार्थ 
१ स्वच्छता अभियान 
२ वृक्षारोपण 
३ सार्वजनिक वाहतुकीचा वापर

इत्यादी...

एक दिवस ठरवून हे सगळे केले तर फायदा आपलाच आहे ना. प्रत्येक महिन्यात एक दिवस असे काही तरी नवीन करावे. बघुया कसं काय प्रत्यक्षात होईल हे.  - हर्षद कुंभार...  

Saturday, June 20, 2015

भुत्याबाबा आणि धरीबाबा...

भुत्याबाबा आणि धरीबाबा...

आज एक जुनीच गोष्ट पण नव्याने सांगणार आहे. नावावरुन कोणाला कळलं असेल कोणाला नाही. लहान मुलांची खुप कुतुहल निर्माण करणारी गोष्ट आहे. 
माझे लहाण दोन पुतने एक ३ वर्षाची आणि एक २ वर्षाचा. आमची वहिनी त्यांना घाबरवण्यासाठी दोन काल्पनिक माणसांना वापरते म्हणजेच धरीबाबा आणि भुत्याबाबा. 
आता तरी तुम्हाला कळलं असेलच. आपलं लहाणपण पण असचं कोणत्यातरी काल्पनिक माणसाच्या भितीच्या छायेत गेले असेल. माझ्या लहाणपणचं इतकं काही आठवत नाही पण आई पण मला " तो बाबा घेऊन जाईल हां खा बघु पटकन " असं म्हणायची.
  प्रत्येकाला अस कोणत्या तरी बाबा ने शहाणं केलं असेलच नाही का. त्या काल्पनिक माणसाने लहाणपणी आपल्यावर चांगल्या- वाईटाचे संस्कार केलेले असतील. 
आजही ही एक पध्दत बर्‍यापैकी प्रचलित आहे, जेणेकरून लहान मुले संस्कारांचा बाळकडू पितात. बहुतांशी यात मुलांना खाण्या-पिण्याबाबत, खोटे बोलू नये, लवकर झोपण्याबाबत इत्यादी गोष्टींची भिती दाखवली जाते. 

लहानपणी तुम्हाला लाभलेले असेच बाबा आठवुन पहा किव्वा आईला विचारून पहा गंमत वाटेल.  - हर्षद कुंभार.... 

बाह्यरुप आणि आपण

आपण आपल्या बाह्य रुपाची किती काळजी घेतो ना...  म्हणजे कसं असतं ना नानाप्रकारच्या क्रिम, फेस पॅक, फेस वॉश, वेषभूषा वापरून आपण कितीही खर्च करायला तयार असतो. हे सगळ काही फक्त छान दिसायला पुरते.. 
पण छान वागायला आणि बोलायला इतकी मेहनत कोण घेतं का.... म्हणजे कोणी इतकं करत का की मी इथे असे वागले पाहिजे असे बोलले पाहिजे...  
कसं आहे ना छान दिसण्याने लोकांना काही क्षणासाठी भुरळ घालु शकता... पण आचार-विचार यांनी त्यांच्या मनात घर करून शकता. 
दिसण्यासाठी मेहनत घेतली तरी लोकांना प्रभावित करायला पण मेहनत करावी लागते, कारण जे काही केलय ते दाखवले तर पाहिजे ना म्हणून. त्याउलट वागण्या-बोलण्याने लोक आपोआप प्रभावित आणि आकर्षित होतील.  चांगले दिसणं म्हणजे नीटनेटके आणि स्वच्छ इतकंच महत्वाचे नाही का. 

असो आजवर हा विषय तुम्ही अनेक वेळा वाचला असेल पण माझ्या स्टाईल ने लिहिले आहे तेव्हा थोडं तरी वेगळं वाटलं असणार.  आणि तसंही बदल घडविण्यासाठी चांगल्या गोष्टींचा मारा करत राहिले पाहिजे ना.  - हर्षद कुंभार....

Thursday, June 18, 2015

लपंडाव माझा अन पावसाचा

आभाळ भरून रोजचं येतं... 
गडद रंगाच्या छटा घेऊन, 
जसं काही खुप रागात... 
आजचं सगळा बरसनार.

आम्ही पण खुप तयारीत असतो ,
घेऊन रोज छत्री अन रेनकोट.... 
परंतु ना तो बरसत काही,
अन ना आम्ही पण उतरवत बाही...

किती दिवस टिकेल ,
हे तुझे अन माझे हे लपंडाव .... 
एक दिवस मी जिंकेल ,
एक दिवस तु भिजवशील ... - हर्षद कुंभार....

Saturday, June 6, 2015

..... प्रपंच करावा नेटका....

नमस्कार सगळ्यांना,

आज थोडेच पण महत्वाचे

..... प्रपंच करावा नेटका.... 

हे वाक्य आजवर खुप वेळा कानावर पडलं होतं.  विवाहीत आहे त्यांना " नेटका " या शब्दाचा अर्थ काहींना कळला असेल किंवा काही त्या प्रवासात असतील. त्या सगळ्या व्यक्तींना आज मी काही मागत आहे.  त्यांच्या अनुभवातून तयार झालेल्या महत्वाच्या पण प्राथमिक स्वरुपातील नोंदी ज्या प्रापंचिक आयुष्यात फायद्याच्या ठरतील.
   कारण आजपासून सुरू होत आहे आमचा हा नवा अध्याय. तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद सोबत असतीलच. तर तुम्ही आता काय करायचं की पटापट आपले विचार, अनुभव मला सांगा.  - हर्षद कुंभार...

Friday, April 3, 2015

नित्यक्रम सध्याचा

रोजची सकाळ मला सुट्टी असल्यासारखी सुरु होते. नियमाने गजर लावलेला असतो. तो पण नियमाने डोळे हलकेच उघडुन बंद करायचा. नंतर काय रात्रीपेक्षा अधिक झोप आलेली असते. रुममेट शेवटी ११ ला जाग करतात किव्वा मलाच जाग येते. मग मोबाईल मधे वेळ बघतच स्वतःला शिव्या देत पटापट आवरायचं आणि १२ च्या ऑफिस टाईमला कसबस पोचायचं....
रात्री झोपताना उद्या मात्र लवकर कसही करुन उठायचचं अस ठरवुन जे झोपयचं... ते आहे ती गाडी पुन्हा त्याच रुळावर हा जणु नित्यक्रम बनला आहे....
असो लग्नानंतर हे चित्र नक्की बदलेल तोवर झोपुन घेतो. - हर्षद कुंभार...

Sunday, March 29, 2015

पाऊस मनातला अन डोळ्यातला

काल दि. २८-३-३०१५ रोजी. मी पुण्यातुन काम आटपुन साताऱ्याला निघालो. उन्हाने हैरान गाडी चालवु वाटत नव्हती. कारण काम उरकुन पुण्यातुन बाहेर पडायला पार १ वाजला. कात्रज घाटात असताना सावल्यांचा खेळ चालु झाला. वर पाहिले तर आकाशाच काही वेगळचं चाललं होत. हळु हळु तो आपला एक एक ढग जमा करत चालला होता. थंड वाऱ्याच्या हलक्या झुळुका मध्येच आमचा पाहुणचार घेत होत्या. एक तासाभरात सगळे चित्र पालटत गेलं आणि ढग असे काय भरुन आले की त्यांनी यथेच्य आमचा समाचार घेयला सुरु केलं. हलक्या सरींनी आम्हाला छान सुखद अनुभव दिला. मातीचा सुगंध दरवळु लागला. पाऊस थोडाचं झाला पण वातावरणात मात्र चांगलाच बदल झालेला होता. थोड्याच वेळात घरी पोचलो पण माझ्या मागं मागं ते ढग जणु पाठलाग करत आले होते.. गावी सगळी पिक सराई चालु होती म्हणजे मळनी,वाऱ्याला देणं, वाळवनं.. त्यामुळे सगळ्यांची एकदम तारांबळ झाली. गेल्या गेल्या पहिले गहु वाळवायला टाकले होते ते भरुन ठेवले. नंतर पावसाने इथे पण हजेरी लावली, मग काय काकांचं गहु मळनी आणि हरभरा पण राहिला होता तो भर पावसात मळला. पाऊस पण खरंच परिक्षा घेतो बळीराजाची अवकाळी पावसाने खुप नुकसान होत शेतकऱ्याचं आर्थिक आणि मानसीक पण. कोणाला माहीत पुण्याहुन निघालेला डोळ्यांना सुखवनारा तो प्रवास शेवटी डोळ्यात चिंतीत लोकांपर्यंत संपेल. - हर्षद कुंभार...

Wednesday, March 18, 2015

माझं शब्दात उतरणं

माझं शब्दात उतरणं ,
हल्ली कमी झालय...
मन खुष असतं ,
वेदनांच वर्ष ते सरलय...

सुखातपण थोडे ,
अश्रु ओघळतात़ ...
तेव्हडचं काय ,
शब्दांच बरसन उरलय... - हर्षद कुंभार...

Saturday, January 24, 2015

ऑफिस काम म्हणजे ऑफिस काम असतं

---- ऑफिस काम म्हणजे ऑफिस काम असतं ----

ऑफिसच काम म्हणजे  ...
ऑफिसच कामचं असतं ,
आज कितीही केले तरी ...
उद्या पुन्हा ते येतचं असतं .

सकाळी लवकर जाऊन ...
रात्री उशिरा थांबुन ...
अगदी दिवस कमी पडावा ...
एवढ ऑफिसच काम असतं.

खान-पान विसरुन ...
देहभान हरपुन ...
झोपेला टाळुन ...
इच्छांना जाळुन ...
केलेलं ते ऑफिसच काम असतं .

विचारांमधे काम, बोलण्यातन काम ....
शांततेत पण काम, रागारागत पण काम ...
कधी न संपनार काम , का असतं इतक काम ...
शेवटी ऑफिसच काम म्हणजे ,
ऑफिसच कामचं असतं.... - हर्षद कुंभार...