All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Wednesday, November 23, 2016

जुन्या आठवणी भाग - ३

जुन्या आठवणी भाग -

        रायगडावर जेव्हा जाग आली. हे वाक्य तुम्हाला या पुढील लेखातून कळेलच. ही आठवण आहे तेव्हाची जेव्हा मी भिवंडीला राहत होतो. माझी कंपनी गोरेगावला होती त्यामुळे मुंबईचा आणि माझं संबंध तसा रोजचाच. सोशल नेटवर्किंग मुळे माझी मुंबई मधील महाराष्ट्र ट्रेकर्स या ट्रेकिंग ग्रुप सोबत ओळख झाली आणि पहिला ट्रेक केला तो रायगडचा.

२ दिवसांच्या ट्रेकमध्ये २ गोष्टींनी खूप प्रभाव पडला. एक म्हणजे सर्वात महत्वाच आहे ते महाराजांबद्दल आदर एका वेगळ्या उंचीवर पोचला तो आणि दुसर टकमक टोकावरून खाली ३५० फुट Rappelling (ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी म्हणजे दोरीच्या सहाय्याने खाली उतरणे.).

महाराजांबद्दल आदर प्रत्येकाला आहेच, पण त्याच स्वरूप खूप लोकाच्या मनात वेगवेगळे आहे जे काही योग्य आणि काही अयोग्य प्रमाणात. अर्थात मीही त्याआधी अयोग्य पातळीत होतो पण रायगड ट्रेक केला आणि मला जाग आली असच मी म्हणेन.

महाराज म्हणजे इतिहासात अजरामर झालेलं एक व्यक्तिमत्व. त्यामुळे आम्हाला कमी अधिक प्रमाणात जी काही माहिती होती त्यात भर पडावी म्हणून ट्रेकमध्ये दुर्ग संवर्धन आणि इतिहास संशोधन करणाऱ्या शिल्पाताई परब

यांना आग्रहाने बोलवले होते. त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि महाराजांप्रती सांगितलेली माहिती याने आमचे अज्ञान दूर तर झालेच शिवाय आमचा दृष्टीकोन बदलला.

महाराजांना महाराज किंवा छत्रपती यानेच संबोधणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी समजावले. आपण महाराजांना एकेरी नावाने संबोधणे योग्य नाही कारण तितके आपण लायक नक्कीच नाही. म्हणून जय भवानी …. असे म्हणने पण योग्य नाही. त्यांनी आम्हाला त्यावेळी एक ललकारी शिकवली होती, ज्यावेळी पण महाराजांचा जयघोष करायचा असेल तेव्हा हीच ललकारी म्हणा असे त्यांनी सुचवले होते.  

|| जल, स्थल, अम्बर दे ललकार

  शिवछत्रपतींचा जयजयकार ||

त्याचं हे म्हणन मला अगदी मनापासून पटल जस की आपण वडिलांचा उल्लेख करताना माझे बाबा,वडील किंवा पप्पा असाच करतो ना , नाकी नावाने बोलतो मग तसाच महाराजांना पण महाराज असाच केला पाहिजे.

तेव्हापासून मी आजतागायत फक्त महाराज म्हणून उल्लेख करतो दुसरा कोणी नाहीच माझ्यासाठी महाराज म्हणण्यासारखे. म्हणून मी म्हटलं होत रायगडावर जेव्हा जाग आली.

दुसरा एक अनुभव म्हणजे Rappeling जे प्रथमच तेही ३५० फुट केले होते. २ दिवसाच्या ट्रेकमध्ये पहिल्या दिवसापासून Rappeling सुरुवात झाली होती. अनुभवी लोकांना प्रथम पाठवलं होते जेणेकरून आम्हाला सर्व कळेल. पहिल्या दिवशी काय नंबर आला नाही आणि दुसरया दिवसापर्यंत भीतीने पार जीव जायची वेळ आली होती. अंतरवक्र आकारात असलेला टकमक टोक दोरी द्वारे इतरांना उतरताना पाहून टेन्शन तर खूपच आले होते. थोड्या अंतरानंतर उतरणारा अजिबात दिसत नव्हता. जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा पोटात गोळाच आला होता पण हिम्मत केलीच जे होईल ते होईल म्हणत सुरु केले. भिती हळू हळू गेली पण हवेचा झोत जे काही हेलकावे देत होता विचारू नका, जस काही तो माझ्या हिम्मतीला, धिराला धक्का लावायचं काम करत होता. पण स्वतःला समजावत मी सरांनी सांगितल्याप्रमाणे आजूबाजूचा सर्व परिसर अनुभवला. भिती,थरकाप, दम, हिम्मत आणि नयनरम्य निसर्गाचा आस्वाद या सर्व गोष्टी एकत्रित अनुभवल्या होत्या. आकाश आणि जमीन या मध्ये दोरीवर लटकण्याचा तो अनुभव खूप रोमांचक होता. खाली पहिले की आमचे सहकारी अगदी १-२ इंच इतकी दिसत होती. कधी खाली पोचतोय असे झाले होते.

एकदाच खाली पोचलो तेव्हा शरीर एकदम हलक झाल्यासारखं वाटत होत अगदी शून्य गुरुत्वा सारखं. भानावर आलो तेव्हा जगातली ही इतकी मोठी गोष्ट केल्याचा स्वतःचा सार्थ अभिमान वाटू लागला होता. आयुष्यातले हे २ अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. - हर्षद कुंभार २३/१०/२०१६ ४.१५

   

जुन्या आठवणी भाग - ४

जुन्या आठवणी भाग - ४

माझ लहानपण आणि मी सॉलिड करामती आहेत बरं. त्यातील एक आठवण्याचं कारण आज आॅफिसच्या बाहेर एक चहाची टपरी आहे तिकडे चहा प्यायला गेलो होतो. चहा पिताना अचानक एक छोटसं गोंडस कुत्र्याचं पिल्लू समोर आले. मी त्याला विशिष्ट (आपण नेहमी जस बोलवतो यु यु नाहीतर चू चू करून )आवाजाने बोलवले तर ते माझ्याकडे पळत आले आणि माझ्या शुजवर पुढचे पाय ठेवून एकदम रुबाबदार पद्धतीने उभे राहिले ( कल्पना करायची म्हणाल तर सिंबा मुव्ही मध्ये टेकडीवर छोटा सिंबा सूर्याकडे पाहत असतो अगदी तसंच भासलं मला ).  मला इतके कौतुक वाटले की लगेच मी खाली वाकून त्याला गोंजरले.

जुनी आठवण म्हणाल तर माझ्या लहानपणी म्हणजे मी अगदी ४-५ वर्षाचा असेल आणि आम्ही जिथे चाळीत राहत होतो तिथे पण अशीच ३-४ पिल्ले होती आणि त्यांची आई असे कुटुंब होते. मी सारखा दिवस रात्र तिकडेच खेळायला त्या पिल्लांसोबत. माझी आई अजूनही मला त्या आठवणी सांगते की मी पिल्लांमधला एक की काय म्हणून त्या पिल्लांची आईपण मला कोणतीच हरकत न घेता त्यांसोबत खेळू देयची. अर्थात मी इतका लहान होतो की त्या पिलांचे कान पकडून त्यांना झुला झुलवायचो. आई तर म्हणायची की मी खूप हाल करायचो त्या बिचाऱ्या पिल्लांचे. मला अगदीच सगळं स्पष्ट आठवते असे नाही पण एक काळ्या रंगाचा आणि एक भुऱ्या तपकिरी रंगाचा असे काहीशी पिल्ले होती आणि त्यांचे कान पकडून त्यांना समोर धरून त्यांच्याशी काय बोलायचो देव जाणे.

आजही मी आईकडून ते दिवस आठवून घेतो खास करून पिल्लांचा विषय ते ऐकून माझं मलाच कुतूहल वाटत… - हर्षद कुंभार (२३/११/२०१६ ९.०२ ).            

Saturday, November 19, 2016

फेसबुक सातारा,



फेसबुक सातारा,


साताऱ्याबद्दल काय बोलू आणि किती बोलू. माझं गावचं सातारा त्यामुळे गावची ओढ कायम होती लहानपणापासून. माझा जन्म पुण्याचा म्हणजे सासवडमधला पण लहानपण भिवंडीमध्ये झालेलं आहे. मे महिन्यातली अख्खी सुट्टी गावी असायची त्यामुळे गावची ओढ मनात लहानपणा पासूनच रुजलेली. साताऱ्यामध्ये जितकं काही भौगोलिक द्रुष्ट्या प्रेक्षणीय आहे ते सगळं काही अजून पाहिलेली नाही, अर्थात ते पहायलाच हवं.
पण त्यातल्या त्यात वाईचा गणपती हक्काचा (हक्काचा यासाठी की मी वाईमधील पाचवड हे गाव.) आणि नेहमीचा कारण गावी गेलो की एकदातरी दर्शनाला जातोच. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे महाबळेश्वर पण काहीसे पूर्ण नाही पाहिले, पाचगणी टेबल लॅंड, धोम धरणाचा थोडा भाग, कुसुंबी ( कुसुंबीला जाताना पाचवड आणि पिंपरी गावांमध्ये जो नदीवर पूल आहे त्या तिथे निसर्ग रम्य जागा म्हणजे ते नदीचं पात्र उन्हाळ्यामध्ये हिरवाईने नटलेलं अगदी दूरवर पसरलेलं ), प्रतापगड, वैराटगड, सज्जनगड, तळबीड (कराडमधलं हंबीरराव मोहिते यांच जन्मगाव, ते पाहण्याचा योग्य जुळून आला ते माझ्या एका भावामुळे त्याला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तिकडे झाला होता) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोयना धरण अगदी त्याच्या भिंतीवर जाऊन पहिले आहे. कोयना आणि प्रतापगड पाहिला ती पावसाळ्यातली मित्रांसोबत केलेली ट्रिप लग्नाआधीची तेव्हा सगळे बॅचलर होते (आता ते शक्य नाही ;) ).
हे सगळं लिहायला प्रेरणा मिळाली ती फेसबुकमधील आपल्या “फेसबुक सातारा” पेज मुळे. पेज खूप ऍक्टिव्ह आहे त्याबद्दल खूप अभिनंदन आणि रोज येणारे फोटोसहित पोस्ट त्यामुळे बरच काही नवीन कळत. अगदी आपण पाहिलेला प्रदेश पण कधी कधी फोटोमध्ये नवीन वाटतो आणि त्याबद्दलची माहिती काही वेळेला आपल्यालाही माहीत नसते. आकाशवाणी रेडिओमध्ये मुलाखत आली तेव्हा अभिमान वाटला आणि थेट ऍडमीन ला संपर्क केला म्हणलं मलापण सातारा बद्दल लिहायचं आहे तुम्ही पोस्ट कराल का. गम्मत म्हणजे समोर जो ऍडमीन बोलत होता तो अजय जो की माझ्या मेहुण्याच्या मित्र. बघा जग किती लहान आहे ते. हां आता अजयने जे सुचवले होते ते अजून जमले नाही लिहायला त्या बद्दल क्षमस्व पण म्हणलं एक सुरुवात म्हणून काहीतरी लिहावं म्हणून हा प्रयत्न केला.
मी तळबीडला जाऊन आल्यावर एक लेख लिहिला जो थोडा माहितीपर होता. तसंच फेसबुक सातारा पेजवरून जे काही नवीन ठिकाणे कळत आहेत त्या सर्व ठिकाणी जायची प्रकट इच्छा जागृत झाली आहे. त्यामुळे एकदा तरी त्या सगळ्या ठिकाणी नक्की जाईन. तोवर सगळ्यांची काळजी घ्या आणि सगळ्यांना खुश ठेवा. - हर्षद कुंभार