All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, August 15, 2015

पगारी शेतकरी एक संकल्पना ….

 पगारी शेतकरी एक संकल्पना ….


आज केंद्र आणि राज्य स्तरावर शेतकर्यांबद्दल फक्त सहानभूती दिसते . 
आपला देश हा शेतीप्रधान आहे. तरतूद म्हणून सरकार काय करते आपल्याला सगळ्यांना माहित अहे. फक्त Packege जाहीर केले की झाले, पण किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो हेपण  सर्वांना माहित आहे . हे सगळ असूनही गेली कित्येक वर्ष आपण ऐकतो आहे शेतकरी आत्महत्या करतातच .
भौगोलिक स्तिथी आणि  पावसावर अवलंबून असलेली शेती बेभरवशी आहे . शेती ही उत्पन्न आले तर आले नाहीतर पुढच्या वर्षी तरी नीट होईल या आशेवर चालू असते .

 मी खूप विचार केला आणि परिणामी एका उपायावर येवून विचार थांबला आणि तो  सर्वांपर्यंत पोचलाच पाहिजे असे मला वाटते निदान सरकार पर्यंत पोचून असे काही अमलात आणावे . भारतात प्रत्येक शेतकऱ्याला कमी-अधिक प्रमाणात शेती आहे.  कोणाला एकरी आहे कोणाला गुंठ्यावारी . सरकार ने त्याचे मापन करून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या सरासरी उत्पन्ना वरून एक पगार निश्चित करायला पाहिजे . म्हणजेच दरमह एक नियोजित पगार मिळत असल्याने त्यांचा  उदरनिर्वाह होईल आणि शेतीमधून उत्पन्न आहे त्यावर कर आकारून सरकारला ते  पैसे मिळतीलच जे की शेतकर्यांनाच पुन्हा  पगार स्वरुपात देता येईल . अर्थात कर हा उत्पन्नावर  असला तरी तो सक्तीचा नसावा कारण पावसाअभावी उत्पन्न आलेच नाही तर कर कसा भरणार . तसाही package स्वरुपात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून जो पैसा निर्धारित होतो  तो या संकल्पनेसाठी वापरता येईल . शेतकऱ्यांचा पगार बँकेत प्रत्यक्ष सरकारी खात्यातून जमा होयला पाहिजे . म्हणजे भ्रष्टाचाराचा  दंश या प्रणालीला होणार नाही . अर्थात हे सर्व किती प्रमाणात प्रत्यक्ष शक्य होईल काय माहीत . तुम्हाला हे कितपत योग्य वाटत  आणि जर चांगलं अजून काही यात जोडण्यासारख असेल तर नक्की सांगा .  - हर्षद कुंभार

Tuesday, August 11, 2015

जगण्याची क्रमवारी

कधी कधी काही दिवस
खुप अटीतटीचे असतात...
त्यामुळे जगण्याच्या क्रमवारीत
गोष्टींच प्राधान्य बदलावं लागतं.  - हर्षद कुंभार... 

Thursday, August 6, 2015

शिक्षण आणि आपण

आपली शिक्षण संस्था इतकी गोंधळात टाकणारी आहे की.... आपण शिक्षित होत असतो की अशिक्षित तेच कळत नाही....
म्हणजे बघा हां आपण एखादी पदवी संपादन केली तरी नोकरी मिळेल असे नाही काहीतरी वेगळे शिक्षण घ्यावेच लागते.  त्यापेक्षा जे चलनात आहे तेच का नाही शिकवत, वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. सरासरी वयाच्या २५  वर्षी कामाला लागतो आपण, पण मोजकेच आणि प्रमाणित शिक्षण घेतले तर किमान काही वर्षं आधी तरी कामाला सुरुवात होईल. त्यामुळे जीवनमानात कीती बदल होईल हे कळलं असेल तुम्हाला.  - हर्षद कुंभार... 

Tuesday, August 4, 2015

लोकशाहीचे धोरण

नमस्कार, 
आज मी एका धोरणाबद्दल बोलणार आहे.  संघटितपणे सामान्य माणूस काय बदल करू शकतो ते. अर्थात यात काय नविन आम्हाला पण माहीत आहे असं तुम्हाला वाटलं असेल. पण दोस्तहो मित्रांशी गप्पांच्या ओघात हे मला लक्षात आले. आपण फक्त सरकार किव्वा पुढारी या लोकांवर अवलंबून न बसता लोकशाही या संज्ञेचा योग्य रीतीने वापर करू शकतो. आपल्या सोयीचे असे आपल्या सभोवताली खुप काही बदलता येईल आपल्याला .  म्हणजेच लोकांना लोकांसाठी घडविलेल्या गोष्टी. 

एक उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील यशस्वीपणे राबविण्यात आलेला " पुणे बस डे ".  त्या दिवशी आपल्या सारख्या सामान्य लोकांनीच उत्तम प्रतिसाद देऊन एक इतिहास घडविला.  प्रायोगिक तत्त्वावर केलेला तो प्रयोग खुप काही बोलुन गेला. पण किती लोकांनी तो ऐकला आणि लक्षात ठेवला.  
महिन्यात एखाद्या दिवशी असा प्रयोग करायला हवा.  पुन्हा पुणे बस डे करायला काहीच हरकत नाही.  
तसंच अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या या पद्धतीने आपण अमलात आणु शकतो. 

उदाहरणार्थ 
१ स्वच्छता अभियान 
२ वृक्षारोपण 
३ सार्वजनिक वाहतुकीचा वापर

इत्यादी...

एक दिवस ठरवून हे सगळे केले तर फायदा आपलाच आहे ना. प्रत्येक महिन्यात एक दिवस असे काही तरी नवीन करावे. बघुया कसं काय प्रत्यक्षात होईल हे.  - हर्षद कुंभार...