नमस्कार प्रिय वाचक, माझ्या डिजिटल घरात आपले स्वागत आहे! माझा ब्लॉग हा विचार, कल्पना आणि भावना यांचा एक रंगीबेरंगी कोलाज आहे, जो तुम्हाला माहिती देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी लिहिला गेला आहे. तुम्ही सध्याच्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी, ट्रेंडिंग विषयांमध्ये डोकावण्यासाठी, सर्जनशील कवितांचा आस्वाद घेण्यासाठी किंवा जीवनाच्या कथा वाचून विचारमग्न होण्यासाठी येथे आला असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
All The Contents by Labels
Saturday, May 26, 2018
पक्षी मी थव्यातला ...
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Thursday, May 24, 2018
आयुष्य असावे असे
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Sunday, May 13, 2018
९ महिने ९ दिवस
------------- ९ महिने ९ दिवस -----------
५ महिन्यापुर्वी मी ही कविता लिहायला सुरुवात केली होती ती आज पुर्ण झाली😌. पार कन्यारत्न झाल्यावर 🙄… अगाध महिमा या मनाचा कधी धो धो पाऊस, तर कधी कोरडेच वारे 😬
चाहूल लागताच तुझी…
सुख ओंझळीत साचले ,
स्वप्नांची उंची भली …
मज आभाळ ठेंगणे झाले.
तू आणि फक्त तू …
सर्व भिंती भास तुझे,
हरवून बसते जग …
तुझे माझ्यातील बागडणे.
उमजेल ना बाळा …
माझे लाडे लाडे बोलणे?
की एकटीचेच होईल…
माझे मुक्त बडबडणे!
चातक मी झाले…
आतुरता गगनात मावेना,
दिवस गुंततो असा की …
आठवड्याचे गणित कळेना.
नाना हट्ट तुझे पुरवता…
बाबांची उडते दैना,
हवं नको ते विचारत …
आणतात डोहाळ्यांचा खजिना.
असे असेल, तसे असेल…
सार्या तुझ्या कल्पना,
रंगवून चित्र कितीही …
आमचे मन तृप्त होईना.
९ महिने ९ दिवस…
हे फक्त जगासाठीच झाले,
तुझे अन आमचे नाते तर …
पहिल्या दिवशी रुजले. - हर्षद कुंभार (१३-०५-२०१८ ८.०० संध्याकाळी)
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #मराठी #कविता
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Saturday, May 5, 2018
लिहावे काही...
लिहावे काही…
म्हणुन विचार घेवून बसलो,
उतरतील शब्द…
म्हणुन मन अंथरून बसलो.
जमतील नभ…
म्हणुन ओंजळ करून बसलो,
घेऊन शब्दांचा पसारा…
आज कविता करायला बसलो. - हर्षद कुंभार (०५-०५-२०१८ ९:५६ सकाळ)
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #मराठी #कविता #poem
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Friday, May 4, 2018
ऋतू भाग १
----------------- ऋतू भाग १ -----------------
नेहमी प्रमाणे सुट्टीच्या दिवशी आरामात दिवसाची सुरुवात करणारे आम्ही. आज दोघांना सुट्टी होती तरी न जाणे का मलाच जाग आली होती तरी अंजलीला मी म्हणालो होतो उद्या निवांत उठव म्हणून.
मी फ्रेश झालो आणि लॅपटॉप घेऊन बाल्कनीत जाऊन बसलो. अंजली डोळे चोळतच
“आज लवकर उठलास”
“हां अग आठवडाभर खुप काही सुचत होते म्हणुन आज तयारीत बसलो आहे.”
“अरे व्वा छान ”
“बरे ऐक ना मस्त चहा ठेवतेस का”
“आलेच ”
सकाळच्या शांततेत फक्त पक्षांच्या किलकिलिटाशिवाय इतर आवाज नव्हता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ह्या गोष्टींना मुकतो आपण. विचारांची गाडी सुसाट वेग घेणारच इतक्यात अंजली चहा घेऊन आली.
अंजली चहाचा कप मला देत
“तरी किती सांगत असते लिहीत जा” अंजली चहाचा घोट घेत.
“हो अग इतर वेळी अॉफिसला असताना अगदी प्रतिकूल परिस्थितीत अचानक काही सुचत असते पण ते लिहिने शक्य होत नाही. सुचलेल्या भावना या कळी सारख्या असतात त्या मांडताना पुर्ण उमलु देऊ लागतात नाही तर एक एक पाकळी निसटून जाते.” मी आपल्याच तंद्रीत बोलत होतो.
“चहा झाला का?” या प्रश्नामुळे माझी तंद्री गेली
“नाही झाला अग जा तू मी आणतो कप ” मी लॅपटॉप बाजूला ठेवला आणि समोरच्या टी पोय वर पाय ठेउन चहा प्यायला लागलो. कुठे होतो आणि कुठे पोहोचलो काही कळले नाही.
“लवकर पी थंड होईल नाहीतर.” म्हणत ती किचनमध्ये निघून गेली.
कोणतीच भावना आपण जबरदस्तीने अनुभवू शकत नाही ती नैसर्गिकरीत्या येयला हवी हा साधा नियम लेखनात लागु पडतो.
“अरे झाला का चहा पिऊन ” अंजली किचनमधून विचारत होती. - हर्षद कुंभार (०४-०५-२०१८ १२:४८ भरदुपारी )
क्रमशः….
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Monday, April 9, 2018
भावना...
टिमटिमत्या लाखों,
भावनांमध्ये एकटा चंद्र मी …
परिक्रमा रोजची मस्तकी,
पण कवडसा पाडतात काही.
न्याय द्यावा कोणास,
सार्या माझ्याच भावना…
सुख ही माझे अन दुःख ही,
तरी ऊन्ह - पावसाचा खेळ काही.
सुकाळ कधी, कधी दुष्काळ,
भावनांचा कल्लोळ सारा…
म्हणले विसावु क्षणभर सर बनुन,
पण अकस्मात वीज चमकतात काही.
हसुन सुख संपवावे, रडून दुखः,
जस की आभाळ मोकळे करावे…
पण उद्याही परिस्थितीचा सुर्य उगवेल,
म्हणून आशा मावळतात काही.
खरे जगणे त्यालाची जमले,
राखुनी समतोल या मोसमांचा…
वृक्ष बनुनी दोन हात केले,
तव कठीण काळ आठवावे काही. - हर्षद कुंभार (०९-०४-२०१८ ३.५२)
#KshanKahiWechalele #harshadkumbhar
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Wednesday, March 7, 2018
८ मार्च २०१८ महिला दिन
स्त्री जन्मा तुझी कहाणी…..
आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. दरवर्षी मी ८ मार्चला एक तरी कविता स्त्री जातीला समर्पित करतो. पण या वर्षी मी अनुभवलेल्या भावनांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही कडव्यात सीमित करून तोकड्या शब्दांत मांडणे अयोग्य ठरले असते. यावेळी भरभरून लिहावे म्हणून हा लेख कारण त्याशिवाय भावनांना न्याय मिळाला नसता.
स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजेच मातृत्व आणि असे म्हणतात मातृत्व आल्याशिवाय स्त्रीला पुर्णत्व नाही. मातृत्व म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच असतो स्त्रीचा. हे आपण वाचुन नाहीतर ऐकुन आहे. या सगळ्या गोष्टींचा माझा संबंध थेट आला तो पत्नीच्या मातृत्वाच्या निमित्ताने.
२ मार्च रोजी सकाळी सासूबाईंचा फोन आला की पत्नीला दवाखान्यात दाखल केले आहे. मुळ तारीख होती १६ मार्च त्यामुळे असे अचानकपणे कळले तेव्हा तातडीने मी दवाखाना गाठला सुदैवाने मी गावीच होतो. तिथे गेलो तेव्हा पत्नी दवाखान्यातील आवारात फेर्या मारत होती. डॉक्टरांनी तिला प्रसववेदना याव्यात म्हणून हे सांगीतले होते. तसे तिला पहाटे ३ पासून वेदना जाणवत होत्या आणि डॉक्टरांनी तपासणी करून आजच प्रसूती होईल हे निश्चित सांगितले पण मुख्य कळ येण्यासाठी तिला फेर्या मारणे आवश्यक होते. तेव्हा सकाळी ९ पासून ते अगदी दुपारी १२.३० पर्यंत मी पत्नीला या फेर्या मारण्यासाठी साथ दिली. दरम्यानच्या काळात दर १५ ते २० मिनिटांनंतर तपासणीसाठी जावे लागायचे. आता इतका वेळ चालून माझेच पाय खुप दुखायला लागले तर पत्नीची काय अवस्था झाली असेल. तिला हे सुसह्य ह्वावे म्हणून मी थट्टा, विनोद करून तिचा हा वेळ मजेशीर घालवत होतो.
पण इतका वेळ जाऊन देखील कळा हव्या त्या प्रमाणात येत नव्हत्या म्हणून डॉक्टरांनी मग सलाईनच्या आधारे प्रसववेदना यावी यासाठी इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रसूतीसाठीच्या विशिष्ट पद्धतीच्या बेडवर पत्नीला झोपवले ते पण १२.३० पासून एकाच स्थितीत सलग चार तास तेव्हा कुठे ४.३८ ला आम्हाला आनंदच्या बातमी स्वरूपात कन्यारत्न झालेले कळले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला आणि दिवसभराचा क्षीण क्षणात लोप पावला. त्या नंतरही पत्नीला बराच वेळ तसेच झोपुन रहायचे होते इतर उपचारासाठी. इतका वेळ आपण झोपेत सुध्दा स्थिर राहु शकत नाही आणि तिला शुद्धित तसे करायचे होते. यातही पत्नीने धैर्याने नैसर्गिक प्रसूतीसाठी मन घट्ट केले होते तिच्या प्रबळ इच्छाशक्ती मुळे ती शक्य झाली. प्रसृत झाल्यावर लगेचच पत्नीने हसतमुखाने डॉक्टरांना आधी बाळ दाखवायला सांगितले. यावर डॉक्टरांनी विशेष गौरवउद्गार केले आणि इतक्या वर्षात प्रथमच अशी स्त्री पाहिली जिणे इतक्या वेदना सहन करुनही हसतमुखाने ही मागणी केली असल्याचे सांगितले. यासाठी त्रिवार सलाम माझ्या पत्नीला तेव्हा स्त्रीला उच्च कोटीचे सामर्थ्य असते हे यावेळी अनुभवले. अजून एक सामर्थ्यवान जीव जन्माला आला याबद्दल अतिशय अभिमान वाटतो आहे.
सरतेशेवटी महिला दिनानिमित्त आणि गोंडस बाळाला जन्म दिला याबद्दलसुध्दा माझ्या पत्नीला मनापासून अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद. तसेच भुतलावरील सर्व स्त्री जातीला माझ्याकडुन महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. - हर्षद कुंभार (०८-०३-२०१८)
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Sunday, February 18, 2018
विकासाच्या गोष्टी ….
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Thursday, January 25, 2018
मी भारतीय आहे का ? सारे भारतीय माझे बांधव आहेत का ?
मी भारतीय आहे का? सारे भारतीय माझे बांधव आहेत का?
हाच प्रश्न आता उरला आहे विचारायचा. लोकांमध्ये देशप्रेम कमी होत चालले आहे ते कळते आहे याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. कारण देशात राहून इतकी अशांतता आणि आराजकता माजवणारे लोक भारतीय कसे असू शकतील. गेली २० वर्षे आपण भारत विकसनशील देश आहे म्हणून ऐकत आहोत हे सध्याच्या परिस्थितीवरून पाहता कधीच विकसित म्हणून नावारूपाला येणार नाही हीच वस्तूस्थिती आहे. या वर्षी आपल्या देशात फक्त आंदोलन आणि मोर्चा हेच पाहायला मिळणार आहे. याला कारण आताच्या सरकारला अपयश आले असे दाखवून पुढच्या वर्षी येणाऱ्या निवडणुकीत अडचण यावी. या सगळ्यासाठी हा उपद्व्याप चालला आहे त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की का करतोय हे सगळे सरकारला अपयशी करण्याच्या नादात आपण आपल्या देशाला मागे पाडतो आहे.
सीमेवर रक्षण केले तरच देशभक्ती होते हे विधानच मुळी चुकीचे आहे. देशातील नागरिक म्हणून आपली काहीच जबाबदारी नाही का फक्त सीमेवरील सैनिकांनीच देशभक्ती दाखवावी आपले काहीच कर्तव्य नाही आहे का. इतके कसे स्वार्थी झालो आहोत आपण. आपल्या देशात लोकांना फक्त स्वतःची काळजी लागली आहे नाहीतर स्वतः च्या जातीची. हो म्हणुन तर आंदोलन, मोर्चे इत्यादी गोष्टींचा आधार घेऊन किती नुकसान, वेळेचा अपव्यय करत असतात हे लोक. एखाद्याने मेहनीतीने घेतलेली त्याच्या स्वप्नातली गाडी किती सहज जाळून टाकतात कसलाही विचार न करता.
पण काय आहे ना या सगळ्यात आपण काय करतो आहे स्वतः चा आणि जातीचा विचार. हिंसाचार वाढवून ठेवला आहे देशात इतका की पद्मावत सिनेमाच्या विरोधी गोष्टींत काल एक बसवर दगडफेक केली आहे ते पण लहान मुले गाडीत असताना. किती निर्दयपणे हे सर्व केले जाते कोणाचा जीव महत्त्वाचा वाटत नाही यांना हे कोरगाव भीमा प्रकरणात हकनाक गेलेला एक जीव त्याचेच उदाहरण आहे. म्हणजे बघा स्वतः ची माणुसकीच्या नात्याने काडीची लायकी नसताना सरकारकडे विविध मागण्यांसाठी मागे लागतात हे लोक कोणत्या तोंडाने. फक्त स्वतःच अस्त्तित्व निर्माण करण्यासाठी म्हणून जाळ पोळ करून जबरदस्तीने बंद पाळायला लाऊन भव्य स्वरूपात हे मुद्दाम करण्यात येते.
२६ जानेवारी आपला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इतिहासात पहिल्यांदाच १० देशाचे राष्ट्रप्रमुख येणार आहेत आणि त्या निमित्ताने देशांमध्ये व्यवहारीक आणि मैत्रीचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. या देशात थायलंँड, विएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाऊस आणि ब्रुनीई आहेत. या देशातील करार होऊन व्यापारात एकमेकांना मदत केली जाणार आहे. आशियाई देशात चिनी व्यापार जवळपास २४ टक्के आणि आपला फक्त २.६ टक्के. आपल्या देशातील लोक उद्योगात उतरत नाहीत (उतरेल कसा त्याला वेळ तर मिळाला पाहिजे ना आंदोलन आणि मोर्चांमधुन ) म्हणून मेक इन इंडिया अंतर्गत सरकार बाहेरच्या देशातील उद्योगपतींना भारतात उद्योग सुरू करायला आवाहन करत आहे. भारत येत्या काही वर्षांत आपला हाच व्यवहार २०० हजार कोटी वर घेऊन जायचा विचार करत आहे. पण अश्या घटनांमुळे परकीय गुंतवणूक येईल का आपल्याकडे,रोजगार निर्मिती तरी कशी होणार. हा पण सरकारला मात्र नंतर जाब विचारला जातो काही करत नाही सरकार आपल्यासाठी.
मागे एकदा अमीर खान यांच्या पत्नी किरण राव यांनी एकदा विधान केले होते तेव्हा किती चवताळून , सडकून त्यांच्यावर टीका झाली होती पण आज त्यांचं मत खरं आहे असेच म्हणावे लागेल आता. शांतता प्रिय देश म्हणून इतर देश आपल्याकडे पाहतात पण सांगा काय त्या लायकीचे राहिलो आहोत का आपण. रोज काही ना काही कारणाने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चा करण्यात मग्न आहेत. या लोकांना काहीच काम नसते का हा मला पडलेला प्रश्न आहे. कोण आहेत हे लोक कोणत्या थोर व्यक्तींची नावे घेऊन हे सर्व करत असतात. त्या महान व्यक्ती तर कधी तश्या नव्हत्याच मग एकदम अंध बनुन एखाद्या संस्थेला, संघटनेला सामील होतात लोक. आपण अंतर्गत हिंसक गोष्टींत इतके अडकून पडलो की बाहेरून वेगळा दहशतवादी हवा कशाला ना. दहशतवादी दृष्टीने जे हवय ते भारत मातेचे पुत्र स्वतः करत आहेत.
८०-९० च्या दशकातील दंगलीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत या आजच्या घटनांमुळे. कुठे न्हेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा किंवा देश माझा हा प्रश्न सरकार पेक्षा स्वतः ला विचारला पाहिजे आज ही परिस्थिती आणुन ठेवली आहे. शाळा कॉलेज मध्ये तर कधी आपण जाती-धर्म बघून मैत्री करत नाही. आणि कोणत्या शिक्षण पद्धतीत हे शिकवलं ही जात नाही मग का मोठे झाल्यावर लोक अश्या लोकांना साथ देतात. ही कोणती पिढी जन्मली आली आहे ज्यांच्या डोक्यात हे जातीचे भूत गेले आहे.
आता तरी जागे व्हा नका बळी पडू अश्या संघटना आणि संस्थांना ज्या जात, धर्म यावरून तुमची माथी भडकवत आहेत. जेव्हा गरज असते तेव्हा हे कोणी लोक तुमच्या व्यक्तिगत अडचणींना मदतीला येणार नाहीत . तुमचे वैयक्तिक प्रश्न तर तसेच राहणार आहेत कायम कारण स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावत अश्या लोकांच्या मागे धावता म्हणून. आशा करतो की ज्यांच्यासाठी हे लिहिले आहे त्यांच्यापर्यंत हे पोचावे.
शेवटी काय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हेे प्रतिज्ञ मधील पहिलेच वाक्य किती खरे ठरेल आणि किती खोटे हे पुढील काळच दाखवेल. २६ जानेवारीला सगळ्यांचे एक दिवसाचे देश प्रेम उतू येईलच. काय सांगावे पुढच्या आठवड्यात एखादे आंदोलन मोर्चा असेल ….- हर्षद कुंभार (२५/०१/२०१८ ८.३० pm )
#KshanKahiWechlele #harshadkumbhar
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Wednesday, January 3, 2018
काय घेऊन आलोय आपण या नवीन वर्षात.
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.

