All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Friday, May 4, 2018

ऋतू भाग १

----------------- ऋतू भाग -----------------

नेहमी प्रमाणे सुट्टीच्या दिवशी आरामात दिवसाची सुरुवात करणारे आम्ही. आज दोघांना सुट्टी होती तरी न जाणे का मलाच जाग आली होती तरी अंजलीला मी म्हणालो होतो उद्या निवांत उठव म्हणून.

मी फ्रेश झालो आणि लॅपटॉप घेऊन बाल्कनीत जाऊन बसलो. अंजली डोळे चोळतच

“आज लवकर उठलास”

“हां अग आठवडाभर खुप काही सुचत होते म्हणुन आज तयारीत बसलो आहे.”

“अरे व्वा छान ”

“बरे ऐक ना मस्त चहा ठेवतेस का”

“आलेच ”

सकाळच्या शांततेत फक्त पक्षांच्या किलकिलिटाशिवाय इतर आवाज नव्हता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ह्या गोष्टींना मुकतो आपण. विचारांची गाडी सुसाट वेग घेणारच इतक्यात अंजली चहा घेऊन आली.

अंजली चहाचा कप मला देत

“तरी किती सांगत असते लिहीत जा” अंजली चहाचा घोट घेत.

“हो अग इतर वेळी अॉफिसला असताना अगदी प्रतिकूल परिस्थितीत अचानक काही सुचत असते पण ते लिहिने शक्य होत नाही. सुचलेल्या भावना या कळी सारख्या असतात त्या मांडताना पुर्ण उमलु देऊ लागतात नाही तर एक एक पाकळी निसटून जाते.” मी आपल्याच तंद्रीत बोलत होतो.

“चहा झाला का?” या प्रश्नामुळे माझी तंद्री गेली

“नाही झाला अग जा तू मी आणतो कप ” मी लॅपटॉप बाजूला ठेवला आणि समोरच्या टी पोय वर पाय ठेउन चहा प्यायला लागलो. कुठे होतो आणि कुठे पोहोचलो काही कळले नाही.

“लवकर पी थंड होईल नाहीतर.” म्हणत ती किचनमध्ये निघून गेली.

कोणतीच भावना आपण जबरदस्तीने अनुभवू शकत नाही ती नैसर्गिकरीत्या येयला हवी हा साधा नियम लेखनात लागु पडतो.

“अरे झाला का चहा पिऊन ” अंजली किचनमधून विचारत होती. - हर्षद कुंभार (०४-०५-२०१८ १२:४८ भरदुपारी )

क्रमशः….

No comments:

Post a Comment