All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, August 15, 2015

पगारी शेतकरी एक संकल्पना ….

 पगारी शेतकरी एक संकल्पना ….


आज केंद्र आणि राज्य स्तरावर शेतकर्यांबद्दल फक्त सहानभूती दिसते . 
आपला देश हा शेतीप्रधान आहे. तरतूद म्हणून सरकार काय करते आपल्याला सगळ्यांना माहित अहे. फक्त Packege जाहीर केले की झाले, पण किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो हेपण  सर्वांना माहित आहे . हे सगळ असूनही गेली कित्येक वर्ष आपण ऐकतो आहे शेतकरी आत्महत्या करतातच .
भौगोलिक स्तिथी आणि  पावसावर अवलंबून असलेली शेती बेभरवशी आहे . शेती ही उत्पन्न आले तर आले नाहीतर पुढच्या वर्षी तरी नीट होईल या आशेवर चालू असते .

 मी खूप विचार केला आणि परिणामी एका उपायावर येवून विचार थांबला आणि तो  सर्वांपर्यंत पोचलाच पाहिजे असे मला वाटते निदान सरकार पर्यंत पोचून असे काही अमलात आणावे . भारतात प्रत्येक शेतकऱ्याला कमी-अधिक प्रमाणात शेती आहे.  कोणाला एकरी आहे कोणाला गुंठ्यावारी . सरकार ने त्याचे मापन करून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या सरासरी उत्पन्ना वरून एक पगार निश्चित करायला पाहिजे . म्हणजेच दरमह एक नियोजित पगार मिळत असल्याने त्यांचा  उदरनिर्वाह होईल आणि शेतीमधून उत्पन्न आहे त्यावर कर आकारून सरकारला ते  पैसे मिळतीलच जे की शेतकर्यांनाच पुन्हा  पगार स्वरुपात देता येईल . अर्थात कर हा उत्पन्नावर  असला तरी तो सक्तीचा नसावा कारण पावसाअभावी उत्पन्न आलेच नाही तर कर कसा भरणार . तसाही package स्वरुपात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून जो पैसा निर्धारित होतो  तो या संकल्पनेसाठी वापरता येईल . शेतकऱ्यांचा पगार बँकेत प्रत्यक्ष सरकारी खात्यातून जमा होयला पाहिजे . म्हणजे भ्रष्टाचाराचा  दंश या प्रणालीला होणार नाही . अर्थात हे सर्व किती प्रमाणात प्रत्यक्ष शक्य होईल काय माहीत . तुम्हाला हे कितपत योग्य वाटत  आणि जर चांगलं अजून काही यात जोडण्यासारख असेल तर नक्की सांगा .  - हर्षद कुंभार

1 comment:

  1. http://maymrathi.blogspot.in/2015/08/blog-post_16.html, http://maymrathi.blogspot.in/2015/05/blog-post_28.html
    Pl read my these both articles you will get answer. Hope your answer in back.

    ReplyDelete