नमस्कार प्रिय वाचक, माझ्या डिजिटल घरात आपले स्वागत आहे! माझा ब्लॉग हा विचार, कल्पना आणि भावना यांचा एक रंगीबेरंगी कोलाज आहे, जो तुम्हाला माहिती देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी लिहिला गेला आहे. तुम्ही सध्याच्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी, ट्रेंडिंग विषयांमध्ये डोकावण्यासाठी, सर्जनशील कवितांचा आस्वाद घेण्यासाठी किंवा जीवनाच्या कथा वाचून विचारमग्न होण्यासाठी येथे आला असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
All The Contents by Labels
Books Review/ पुस्तक परिक्षण
(1)
Current Affairs
(1)
Ghazal
(1)
Life Hacks
(2)
Life Style
(2)
Marathi
(1)
qoutes /सुविचार
(1)
Traveling Spots
(1)
Trending Topics
(1)
इतर कविता
(23)
इतर कविता / General Poems
(84)
कविता
(4)
कविता/Poem
(2)
ग़ज़ल
(6)
चालू घडामोडी
(10)
चालू घडामोडी /Current Affairs
(8)
चालू घडामोडी/Current Affairs
(9)
जीवनशैली
(13)
प्रेम कविता / Prem Kavita
(60)
प्रेम कविता /Love Poems
(4)
प्रेरणादायी कविता
(3)
प्रेरणादायी कविता / Inspiring Poems
(10)
मराठी
(6)
मराठी कविता
(6)
मराठी कविता / Marathi Kavita
(2)
मराठी कविता / Marathi Poetry
(1)
मराठी कविता / Poems
(1)
मराठी कविता /Marathi Poem
(1)
मराठी कविता /Marathi Poetry
(3)
मराठी ग़ज़ल
(4)
मराठी लेख / Articles
(18)
मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा
(3)
मराठी सुविचार /Quotes
(1)
मुक्तछंद
(1)
मैत्रीच्या कविता
(7)
मैत्रीच्या कविता / Friendship Poems
(10)
लेख /Articles
(18)
लेख Marathi Lekhan
(3)
लेखन
(10)
लेखन / Marathi Lekhan
(57)
विचार / thoughts
(2)
विडंबन कविता
(2)
शायरी
(1)
सुविचार / One Liner
(2)
सुविचार / Quotes
(2)
सुविचार /Quotes
(7)
सुविचार/Quotes
(1)
हिंदी
(1)
हिंदी / Quotes
(1)
हिंदी Quotes
(1)
हिंदी कविता / Hindi Poems
(2)
हिंदी कविता /Hindi Poems
(3)
हिंदी कविता /Poems /Quotes
(1)
हिन्दी कविता / Hindi Poems
(2)
Thursday, November 15, 2012
एकालाच जमलं वाघ होयला....
Labels:
इतर कविता / General Poems

Sunday, November 11, 2012
लहानपणाची दिवाळी
सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या खूप खूप शुभेछ्या. आनंदी रहा सुखी रहा
माझ्या या एका प्रश्नार्थक वाक्यानेच तुम्हाला तुमचे दिवाळी साजरी केलेले लहानपण आठवले असेल. हो कि नाही.
दिवाळीच्या काळात तुम्ही खूप दिवाळी अंक आणि लेख वाचले असतील पुस्तकात नाहीतर कोणत्यातरी वेबसाईटवर.
मी तुम्हाला माझ्या लहानपणाची दिवाळी सांगणार आहे. बघा बर तुमच्या लहानपणाशी मिळती जुळती आहे का ते.
तर सुरुवात करूया चला तर मग आपल्याला १२ वर्ष मागे जावे लागेल.
अर्थात जे मी काही सांगणार आहे ते सगळे शालेय कालखंडातले आहे बर का !
शाळेत परीक्षेचे वेळापत्रक लागले की आधी संपते कधी या गोष्टीवर जास्त भर असायचा.
कारण दिवाळीच्या सुट्टीची सगळेच आतुरतेने वाट पाहत असायचो . कधी एकदाचे पेपर संपतील असे होयचे.
आणि एकदा कि पेपर संपले कि बास नुसता धुडघूस असायचा आमचा चाळीत.
हो चाळीतच अर्थात दिवाळीची खरी मज्जा ही चाळीतच येते हे वेगळे सांगायला नको नाही का.
सर्वात आधी गेल्या दिवाळीची पिस्तुल आहे का ते शोधायचे काम आम्ही करायचो. ती चांगल्या अवस्तेत असेल तर ठीक नाहीतर बाबांच्या मागे लागून नवीन घेयचीच.
मला आठवतंय एकदा बाबांनी मला एक लोखंडी पिस्तुल आणली होती ती एकदम खरी पिस्तुलासारखी दिसायला होती आणि ते गोळ्या भरायचे हे तसेच होते फिरायचे ते गरगर.
दिवाळीच्या आधीच त्या पिस्तुलांनी आम्ही चोर - पोलीस खेळायचो. टिकल्या बंदुकीत भरून कंटाळा आला की एक कागदावर सगळ्या जमा करून
तो कागद पेटवायचा त्यात काही औरच मज्जा असायची. टिकल्यांची रीळ असली की निरनिराळ्या पद्धतीने त्या फोडण्याचा आमचा प्रयत्न असायचा.
जसे की नट आवळायची पक्कड घेयाची त्यात टिकली धरून फोडायची.
नाहीतर रीळ घेवून थोड्या रफ जागेवर बोटाने जोरात घासायची आणि टिकली फोडायची. असे आणि असेल प्रकार आम्ही करायचो
हे सगळे दिवाळीच्या आधी बर का. बाबा दिवाळीच्या आदल्या रात्री कधी फटाके आणायचे हे कधी कळले नाही आम्हाला.
पण सकाळी लवकर उठून सर्वात आधी आम्हाला फटाके दाखवून
लवकर उटन लावून अभ्यंगस्नान करायला लावायचे. तेव्हा अभ्यंग स्नानाचा खूप कंटाळा येयचा ते खरखरीत उटन आईला अंगाला लावायची अगदी नको वाटायचे ते.
पण महत्वाचे हे होते कि चाळीत सर्वात आधी उठून पहिला फटका कोण फोडणार. जणू शर्यंत लागली असायची तेव्हा. थोडा अंधार असे पर्यंत फटाके फोडायचे.
फटाके पूर्ण माळ आम्ही फोडलेली आठवत नाही उलट माळ सगळ्या सोडवून एक एक फटका फोडायला खूप आवडायचे. तो फटका पण कसा फोडायचा माहितेय
कुठ भिंतीत फट असेल तर तिथे खोचून फोडायचा. नाहीतर फटाक्यांचे रिकामे खोके घेयचे त्याच्यात ठेवून फोडायचा. अहो आम्ही तर काय करायचो माहितेय
पिठाच्या गिरणीतून खाली पडलेले पिठी पिशवीत आणायचे. आणि मुठभर पीठ खाली जमिनीवर ठेवायचे त्यात एक फटका खोवायचा आणि मग फोडायचा.
ते अक्षरशः चित्रपटातल्या दृष्यागत वाटायचे फुटताना आगीचा एक लोट उठायचं तेव्हा. खूप करामती केल्या त्येवेळेस आता आठवले कि फार छान वाटते.
चाळीत अजून एका गोष्टीची शर्यत असायची कुणी जास्त फटाके फोडले आणि त्यासाठी आम्ही एक शक्कल लढवायचो. रात्री गुपचूप आजूबाजूचा फटाक्यांचा कचरा स्वतःच्या घरासमोर
आणून ठेवायचा म्हणजे दुसऱ्याला वाटेल अरे किती फटके फोडलेत याने. मुळात दिवाळी या गोष्टीवर थांबत नाही अजून खूप काही असते. सुट्टी संपेपर्यंत बाकी गोष्टी इतक्या लक्षात राहण्यजोग्या
नव्हत्या किव्वा नसतील म्हणून ठळक काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत.
आठवणीतले बरेच क्षण सांगण्याचा मी प्रयत्न केला. अर्थात तुम्हाला जे नक्कीच आवडले असेल. आणि तुमचे बालपण तुम्हाला आठवले असेल अशी अशा करतो. तुम्ही केलेल्या काही अतरंग गोष्टीपण असतील नाकी कळवा. - हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Saturday, October 13, 2012
प्रेम म्हणजे फक्त ...
प्रेम म्हणजे फक्त ...
सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी होताना पाहणे का ?
प्रेम म्हणजे फक्त ...
दिवस रात्र तिच्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि सतत ती जवळ असावे असे वाटणे
तिच्याशी बोलू वाटावे असे कि जसे जग फक्त दोघांचे आहे?
प्रेम म्हणजे फक्त ...
हेच कि ज्यात गुलाबाच्या फुलाला, विशिष्ट रंगाला अती महत्व येण . साऱ्या
सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी होताना पाहणे का ?
प्रेम म्हणजे फक्त ...
दिवस रात्र तिच्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि सतत ती जवळ असावे असे वाटणे
तिच्याशी बोलू वाटावे असे कि जसे जग फक्त दोघांचे आहे?
प्रेम म्हणजे फक्त ...
हेच कि ज्यात गुलाबाच्या फुलाला, विशिष्ट रंगाला अती महत्व येण . साऱ्या
नाजूक भावना जणू
फक्त त्याच काळात जन्माला येण. आयुष्यात काहीतरी नवीन घडतंय या भावनेने जगत राहण ?
प्रेम म्हणजे फक्त ...
ज्यात आपण विरहाच्या दुखाने साथीदाराशी बोलताना चंद्र ,सूर्य, ताऱ्यांचे नजराणे देत असतो.
प्रत्येक ती गोष्ट जी तिला आवडते त्यासाठी स्वतःच हट्ट धरणे. तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते
करू असे या ताकतीने भरून येणे.?
अशीच असते का प्रेम कहाणी ? कि अजून काही - हर्षद कुंभार
फक्त त्याच काळात जन्माला येण. आयुष्यात काहीतरी नवीन घडतंय या भावनेने जगत राहण ?
प्रेम म्हणजे फक्त ...
ज्यात आपण विरहाच्या दुखाने साथीदाराशी बोलताना चंद्र ,सूर्य, ताऱ्यांचे नजराणे देत असतो.
प्रत्येक ती गोष्ट जी तिला आवडते त्यासाठी स्वतःच हट्ट धरणे. तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते
करू असे या ताकतीने भरून येणे.?
अशीच असते का प्रेम कहाणी ? कि अजून काही - हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Tuesday, October 2, 2012
|| माझ्या FB वरील नावाची जन्मकथा ||
|| माझ्या FB वरील नावाची जन्मकथा ||
नावाची जन्म कथा नेहमीच खूप आकर्षक असते. मी मध्यंतरी एकदा एक पुस्तक पहिले होते त्यात आता पर्यंत सर्व नामांकित असलेल्या नावाच्या जन्मकथा होत्या. उदारणार्थ HP , Microsoft , इत्यादी. कंपन्या यांच्या नावाच्या जन्मकथा खूप छान होत्या. अर्थात हे ज्याने वाचल्या असतील त्याला किव्वा वाचेल त्याला कळेलच.
तर इथे मुळ विषय असा की जसे या लोकांनी त्याच्या या गोष्टी शेयर केल्या तसाच मी ही प्रयत्न करावा असे मला वाटले म्हणून हा लेख. मी जेव्हा प्रथमतः फेसबुकवरला जुळतो तेव्हा आपले साधेच नाव टाकले होते " Harshad Kumbhar " असे आणि तेव्हा मी कविता देखील करत नव्हतो आणि फेसबुकपण जास्त वापरात नव्हते फक्त account काढून ठेवले होते जसे आता twitter वर आहे . तेव्हा ओर्कुटचा जमाना होता. त्यावेळेस ओर्कुटवर पडीक असायचो. सुरुवातीच्या काही कविता मी ओर्कुटमध्ये पोस्ट केल्या आहेत.
कालांतराने फेसबुक वापरात आले ज्या वेळेस मी कविता करण्याच्या पूर्ण भरात होतो. मग ओर्कुट सोडून फेसबुक वर कविता हळू हळू टाकायला सुरुवात केली. आता मराठी कविता असल्याने माझा मराठी बाणा जागा झाला होता आणि मी फेसबुकवरचे माझे नाव " हर्षद कुंभार " असे केले. काही दिवसांनी त्यातपण बदल करून मी आमचे मुळचे आडनाव लावून असे नाव केले " हर्षद राजे " . आले की नाही नावात वजन. मलाही अभिमानास्पद वाटायचे ते. FB मध्ये मित्रांना पण आवडले नाव ते. खूप जणांच्या कमेंट त्यावेळेस मला मिळाल्या होत्या.
खूप काळ हेच नाव मी ठेवले होते.
एकदा मला सहजच वाटले की यार प्रत्येक नामांकित व्यक्ती कोणत्यातरी खास ओळखीने नावाजलेला असतोच. महाराष्ट्राला लाभलेले कवी पहिले की सर्वाना टोपण नावे आहेत. त्यावेळेस मला कोणता ज्वर चढला देव जाने वाटले की आपले असे काहीतरी नाव असावे जेणेकरून ती आपली ओळख बनेल. मग झाली नाव काय असावे हे ठरवण्याची मोहीम. खूप विचार केला काही सुचेनाच. यात बराच वेळ गेला बर का तोपर्यंत माझे नाव " हर्षद राजे " हेच होते.
एके दिवशी मी टीवी वर " My Name Is Khan " चित्रपट पहिला. एक वेगळेपण होते या नावात आणि त्यावेळेस एक मेसेज खूप वेळा मी पहिला ज्यात हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची नावे जर तो चित्रपट मराठीत केला तर त्याचे नाव काय असेल अश्या प्रकारचा होता. आणि मला त्यावेळेस सुचले की यार जर " My Name Is Khan " असा चित्रपट मराठीमध्ये बनवला तर त्याचे नाव काय असेल. आणि डोक्यात एक नाव आले ते होते " पाटील म्हणतात मला " . अर्थात ते इतके आवडले मला ना म्हंटले यार मराठी निर्मात्यांनी असा एखादा चित्रपट नक्की काढावा.
कदाचित हा लेख वाचून कुणी हे नाव सुचवेल पण कुणाला चित्रपटासाठी.
तर आता पुढे यावरून मी माझ्या नावाची शक्कल केली आणि सध्याचे तुम्ही पाहत असलेल नाव " कवी म्हणतात मला " हे त्यावरून सुचलेले आहे. तुम्हालापण या नावाची सवय झाली आहे हो की नाही आणि हे नाव दिसले कोणत्या कविताच्या खाली की लगेच तुम्हाला कळते ही हर्षद कुंभार ची कविता आहे. सरळ म्हणायले गेले तर हीच ओळख बनली आहे माझी त्या नावातल्या वेगळेपणामुळे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असाच राहूद्या आणि हे नाव पुढेही माझी अशीच ओळख बनून राहिलं हीच अशा करतो.
- तुमचा हर्षद कुंभार ( फेसबुक वरचा कवी म्हणतात मला )
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Saturday, August 25, 2012
" परतलेला भात "
" परतलेला भात "
आज अजून एक वेगळा लेख. मी नेहमीच माझे स्वानुभव तुमच्याशी शेयर करत असतो. तुम्हीपण चवीने ते वाचता लाईक करता शेयर करता त्याबद्दल आभारी आहे. तर आजचा लेख आहे तो एका खाद्य पदार्थाबद्दल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या कवीला काव्य अन या गोष्टी सोडून मध्येच खायचे काय सुचले. पण खायचा पदार्थ तर ऐका आधी.
हा पदार्थ आहे " परतलेला भात ". अर्थात आई लहानपणापासून जे म्हणत होती तेच नाव मीपण सांगत आहे. तुमच्या घरी याला अजून काही म्हणत असतील. पण एक गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रात हा पदार्थ लहान थोरापासून सगळ्यांना आवडणारा आहे. आधी लहान असताना आई बनवून देयची जेव्हा पासून नीट कळायला लागले मी स्वतः करायला लागलो.
हा भात करण्यासाठी मुख्य गोष्ट लागते ती म्हणजे रात्रीचा शिळा भात. आता तुमच्या चांगलेच लक्षात आले असेल मी कोणत्या खाद्य पदार्थाबद्दल बोलत आहे. आधी मी माझी स्वतःची पद्धत सांगतो मी कसा बनवतो ते.
चला तर मग करूया सुरुवात
साहित्य : रात्रीचा शिळा भात, २-३ हिरव्या मिरच्या, हळद , जिरे , मोहरी, शेंगदाण्याचा कुट, थोडेसे तेल.
कृती : प्रथम शिळा भात जरा मोकळा करून घ्या. भातावर थोडी हळद टाकून जरा मिश्रण करून घ्या. कढईत थोडे तेल तापवून घेवून त्यात जिरे , मोहरी, आणि मिरची ही फोडणी तळा. आता . आता तो भात त्या कढईत टाकून मस्त फोडणीसोबत परतून घ्या. त्या नंतर त्यावर १-२ शेंगदाण्याचा कुट टाकून थोडा मिश्रण करून मंद आचेवर थोडा वेळ ठेवा की झाला तुमचा भात.
तर ही झाली माझी कृती प्रत्येकाची आपली वेगळी कृती असेल घरची. पण हमखास सगळ्यांच्या घरी होणारा हा पदार्थ आहे तर मित्रांनो माझ्या या लेखाशी सहमत असाल तर मलाही सांगा तुमचा अनुभव. चला काळजी घ्या. - तुमचा कवी हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Sunday, August 19, 2012
Ek Kavita
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Sunday, August 5, 2012
मैत्रीच नातं ....
मैत्रीला कोणतीच परिभाषा नाही
आणि परिसीमा ही नसते.
अनोळखी कुणी कधी
इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही
जीवनाच्या प्रवासात ...
अपघाताने कोण अचानक येतो ...
मत आणि मन जुळवत आपलसं होतं.
तर....
कधी नेहमीच सोबत असणार ...
कुणी दुर्लक्षित एक...
मैत्रीच नातं बेमालुणपणे जपत असतं. - हर्षद कुंभार

Friends Forever Then...
हाताच्या कोपऱ्यापर्यंत...
बांधून फ्रेंडशिप band,
मार्करने गिरगटून...
भरवलेले T -Shirt n Hand
मोबाइलचा inbox भरून...
वाहतो फ्रेंडशिपच्या sms नी,
स्वताच्या मनातले काही नसतं...
पाठवतात sms सारी उसनी.
जर मानतो आपण..
सदा फ्रेंड्स Forever ,
मग का celebrate करावा..
फक्त एका day वर. - हर्षद कुंभार

Saturday, August 4, 2012
मनाची सुंदरताच...
" चेहरा कितीही सुंदर असला तरीही मन सुंदर असावयास हवे. जर मन शुद्ध नसेल तर त्या सुंदर चेह-याचा काय उपयोग. म्हणून सुंदर पवित्र आणि शुद्ध मन ठेवा. ते मन स्वतःला आणि आपल्या जवळच्या मित्र परिवारास, नातेसंबंधितांना आनंदित, समाधानी ठेवेल. यातूनच ईश्वरी कृपेची अनुभती घ्या आणि ती निश्चित मिळेल याची खात्री बाळगा." - प्रदीपकुमार केळकर
मुळ विचार प्रदीपकुमार केळकर यांचे आहेत . त्यांच्या इच्छेनुरूप मी त्यांच्या प्रगल्भ विचारांना काव्यरूप दिले आहे. त्यांच्या अनुमतीने मी
केलेली ही कविता तुम्हाला अर्पण करत आहे मित्रांनो.
चेहेऱ्याचे रंग रूप...
असो कितीही छान,
मनाची सुंदरताच...
शेवटी करते महान.
कलुषित, ग्रासलेल मन...
न देई कसलीच सुंदरता,
फासून लाख प्रसाधने...
न येईल ती उदारता.
पवित्र,शुद्ध विचारी मन...
करील आनंदी चारही दिशा,
नातलग,मित्रपरिवारात...
नांदेल सुख-समाधानाचा वसा.
ईश्वर मनी तेच असते...
जे तुम्ही चिंतिता,
स्वच्छ मनी वाहुद्या...
सदा सुविचारांचा झरा. - मुळ विचार (प्रदीपकुमार केळकर) , कविता अनुवादन (हर्षद कुंभार)
मुळ विचार प्रदीपकुमार केळकर यांचे आहेत . त्यांच्या इच्छेनुरूप मी त्यांच्या प्रगल्भ विचारांना काव्यरूप दिले आहे. त्यांच्या अनुमतीने मी
केलेली ही कविता तुम्हाला अर्पण करत आहे मित्रांनो.
चेहेऱ्याचे रंग रूप...
असो कितीही छान,
मनाची सुंदरताच...
शेवटी करते महान.
कलुषित, ग्रासलेल मन...
न देई कसलीच सुंदरता,
फासून लाख प्रसाधने...
न येईल ती उदारता.
पवित्र,शुद्ध विचारी मन...
करील आनंदी चारही दिशा,
नातलग,मित्रपरिवारात...
नांदेल सुख-समाधानाचा वसा.
ईश्वर मनी तेच असते...
जे तुम्ही चिंतिता,
स्वच्छ मनी वाहुद्या...
सदा सुविचारांचा झरा. - मुळ विचार (प्रदीपकुमार केळकर) , कविता अनुवादन (हर्षद कुंभार)
Labels:
इतर कविता / General Poems

"अंकल ये रस्ता किधर जाता है " .
फार जुनी घडलेली ही सत्य घटना आहे. तेव्हा मी नुकतीच विज्ञान शाखेची पदवीधर परीक्षा दिली होती. आणि सुट्टीचा काळ होता. लग्न सोहळा म्हंटले की काय धाम धूम असते तुम्हाला माहीतच आहे. आणि तेव्हा आमच्या घरात पहिलेच लग्न माझ्या मोठ्या भावाचे ठरले होते. मी त्या वेळेस साहजिकच खूप खुश होतो. तेव्हा माझ्या घराचे सगळे पुढे गावाला लग्नाच्या तयारीला गेले होते . मी आणि माझ्या मावस भाऊ दोघे नंतर जाणार होतो.
तर मी माझ्या मित्रांना पत्रिका देण्याचे काम चालू केले होते. बरीचशी झाली होती देयची, आता फक्त एक मित्र जो जरा लांब राहायला होता. म्हंटले त्याला शेवटली देऊ. म्हणून त्या लांब राहणाऱ्या मित्राला पत्रिका देयचे ठरले. त्यावेळेस मोबाइल आमच्या एकाही मित्राकडे नव्हता त्यामुळे संवाद साधायला काही साधन नव्हते.
त्या मित्राकडे मी एकदाच गेलो असल्याने फारसे काही लक्षात राहिले नाही कुठून कसे जायचे ते. आणि त्या मित्राकडे जायला फार गल्ली-बोळ असे पार करून जायला लागते. तेव्हा संभ्रमात असे काहीच लक्षात राहिले नाही.
मी अन माझा मावस भाऊ दोघे संध्याकाळी त्याच्याकडे जायला निघालो. तेव्हा ५-६ वाजले असतील आणि आम्ही त्या मित्राच्या घराजवळ
गेलो तेव्हा ७ वगैरे झालें असतील. आम्ही दोघे कधी या बोळातून तर कधी त्या गल्लीतून जात होतो पण ओळखीचे असे काहीच दिसत नव्हते.
माझा भाऊ मला शिव्या घालत होता की कुठे कुठे फिरवतोय म्हणून , तो आणि दोघही खूप वैतागलो होतो. एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही एका बोळात गेलो तिथे खूप अंधार होता आणि एक इसम इथे त्याच्या घराच्या उंबऱ्यात बसला होता. पुढे अंधार असल्याने मी त्या
इसमाला विचारले "अंकल ये रस्ता किधर जाता है " .
त्या अंकल ने जे उत्तर दिले त्याने आम्ही दोघे जे काही हसत हसत तिथून पलायन केले की. कारण ते अंकल काय म्हणाले माहितेय
"ये रस्ता हमारी मोरी में जाता है.". त्याने आम्हाला काय समजले देव जाणे पण शिव्या घालत होता. मग आम्ही तिथून पळ काढणे भाग होते.
भाऊ कंटाळून शेवटी म्हणाला जाऊदे ना यार , चल जाऊ घरी. मीपण म्हंटले ठीक आहे चल करून तिथून निघालो आणि समोर त्या मित्राचाच लहान भाऊ दिसला. काय सांगू तेव्हा इतके हायसे वाटले ना काय सांगू, सरते शेवटी त्याच्या घरी गेलो घडलेला सगळा प्रकार सांगितला. एकदम सगळीकडे हशा पिकली. त्याला पत्रिका दिली आणि निघालो घरी जाई पर्यंत आम्ही दोघे सारखे हसत होतो त्या अंकलला आणि त्याच्या त्या वाक्याला आठवून. - हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Saturday, July 21, 2012
इंद्रधनूगत प्रेम...
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Thursday, July 19, 2012
पण आपण
काळ्या कुट्ट नभातून...
आशेचा किरण झळकतो...
पण त्यातून आपल्या उमेदी का जाग्या होत नाही.
निर्जन डोंगर माथ्यावर...
सहज फुले अन पालवी फुटते...
पण त्यातून आपण जगण्याचा हुरूप का घेत नाही.
दुसऱ्यांवर सल्ल्यांचा...
पाऊस आपण पडतो...
पण त्याच पावसात आपण स्वतः का भिजत नाही. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Labels:
इतर कविता / General Poems

Sunday, July 8, 2012
-- तुझ्या अन माझ्यात--
-- तुझ्या अन माझ्यात--
अबोल असा करार आहे,
जरी नसेल बोललो काही...
सारा मनाचा कारभार आहे.
तुझ्या अन माझ्यात...
विणलेल छान स्वप्न आहे,
जरी नसेल सोबत विणल...
तरी सार मनोमनी ठरलेलं आहे.
तुझ्या अन माझ्यात...
भले दुराव्याची रेषा आहे,
परिस्थितीने दूर जरी...
मनी ध्येयाची मनीषा आहे. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Saturday, July 7, 2012
मी चुकत असेल
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Sunday, July 1, 2012
एक दिवस मी ... इतका हतबल होईल वाटले नव्हते
एक दिवस मी ...
इतका हतबल होईल वाटले नव्हते,
ती अश्यारीतीने माझ्याशी वागेल
हे खरच वाटले नव्हते.
आम्ही खूप प्रेम केले...
अगदी दिवस दिवस एकमेकांत गुंतून,
सारखे आठवते तिने मान्य केलेलं ते प्रेम...
चार चौघातपण एकांत साधून.
आज सगळे एकदम स्तब्ध...
आजुबाजूच विश्व जस थांबल काही,
फक्त मी तिच्या विचारात...
जसा जगाचा अन माझा संबंध उरला नाही.
मैत्री दाखवायला की
"हां तुझी आठवण येते "
हे समजायला कधीतरी मेसेग करते.
पण त्यात Love , प्रेम असले शब्द वगळून
तिला प्रेमाचा तिरस्कार आहे की माझा
काही कळायला मार्ग नाही,
पर्स्थितीने ती अशी वागत आहे की मुद्दाम
का तिने सांगितले नाही.
पण मी हरणार नाही ...
प्रेम काल जसे तसेच उद्याही असेल,
सांगा तिला मी तिथेच उभा...
तुझा हात धरायला तयार असेल. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Saturday, June 30, 2012
मी नेहमी तुम्हाला ...
मी नेहमी तुम्हाला ...
तिच्या सौंदर्यात भुलवतो,
तुम्ही तिला पहिले नसताना...
मी नेहमी तुम्हाला ...
तिच्या शब्दांमध्ये गुंतवतो,
तुम्ही तिला ऐकले नसताना...
मी नेहमी तुम्हाला...
तिला माझ्या काव्यातून दाखवतो,
तुम्ही तिला ओळखत नसताना...
मी नेहमी तुम्हाला...
आमच्या प्रेमात जगवतो,
तुम्ही आमच्यापासून दूर असताना... - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Sunday, June 24, 2012
पावसा ....
आज बरसलास तू इतक्या दिवसांनी...
का काहीच कसे वाटत नाही तुला,
कोण वाट पाहत असेल ...
का जाणवत नाही तुला,
एक तर आधीच असतोच...
फक्त तीनच महिने,
त्यातपण तुझे आधीच...
ठरलेले असते उशिरा येणे.
तुझ्या चाहुलीनेच फक्त...
इथे कवींचे होते काव्यरूप बरसणे,
तुझ्या कल्पनेने सगळ्यांना...
अगदी चिंब चिंब भिजवणे. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Labels:
इतर कविता / General Poems

Sunday, June 17, 2012
माझेच मन ते...
थोडा वेळ दिला मनाला ...
तिच्या विचारांमध्ये अंत घाठायला,
सगळ्यांपासून दूर....
क्षितिजात तिच्यासवे फिरायला.
मनानं मला एकटे केलं...
काही काळ दूर लोटलं होत,
तो तिच्या विचारात गुंग असे...
माझं मात्र त्याच्या परतीच वाट पाहण चालू होत
अखेर तो आलाच...
गाठोड्यात सांर काही बांधून,
माझेच मन ते...
सांर काही ठेवलं माझ्यापुढ मांडून. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Sunday, May 6, 2012
सत्यमेव जयते
अमीर खान ने पुन्हा सिद्ध केले की तो नेहमीच वेगळे प्रयत्न करतो ते.
त्याचा सामाजिक कार्यात नेहमीच उलेखनीय सहभाग राहिला आहे.
इतके दिवस त्याने ताणून धरलेली उत्सुकता शिगेला पोचली होती.
आणि त्याच्या या पहिल्याच एपिसोडने सगळ्यांची मने जिंकली खरी
. त्याने बरोबर भारतीयांची दुखती नस पकडली आहे आणि तीच दबून तो
आता प्रत्येक भारतीयाचा आवाज बाहेर काढणार आहे.
या आधी असे कधी दूरदर्शन जगतात झाले नव्हते. पण अमीर ने करून दाखवले
त्याला कुणाचे मनोरंजन करायचे नाही तर न्याय मिळवायला जी लोक कुणाचा तरी आधार शोधत
आहेत तोच आधार तो या मिडियाच्या मार्गे मिळवून देत आहे.
आता फक्त त्याचा परिमाण किती आणि कसा होतो हेच सगळ्यांच्या मनी असेल.
प्रत्येक भारतीयाने त्याचा या प्रयत्नाला खरच साथ देयला हवी. स्त्री भ्रुण हत्याच्या एपिसोडने
बरेच धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. असेच करून या शो मार्गे तो एक एक गोष्टी बाहेर काढेल ही अपेक्षा आहे
- हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Saturday, May 5, 2012
---- मन एकटे ----
Labels:
इतर कविता / General Poems

Friday, May 4, 2012
Ek Kavita - Anamik
शब्दांच्या मागे नको लागुस
ते तुझे गुलाम आहेत,
तू बोलशील तसे अर्थ
ते तुला समजावून देतील.
सरळ रस्त्याने नको जाऊस...
पायवाट हवीशी वाटेल,
यशाची वाट पहायची...
सवय कशी बरे राहील.
किती चालायचे हे नको ठरवूस...
फक्त चालत राहायचं,
थोडे रडणे जरी असले,
हास्याच औषद त्यावर लावायचं. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Labels:
इतर कविता / General Poems

Friday, April 27, 2012
---------- मन शशांक आहे----------
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Sunday, April 22, 2012
!!!!! -- स्वप्नपरी -- !!!!!!
!!!!! -- स्वप्नपरी -- !!!!!!
सगळे संपलय आता.
आता फक्त मी उरलोय,
एकटाच पुन्हा त्याच जागी.
जिथे फक्त मी होतो...
आणि तीच स्वप्नातली परी
जिला मी माझ्या कवितांमध्ये
पाहायचो...
एक असे प्रेम ज्यात इतर
कोणतीच भावना नसायची.
मला हवे तेव्हा तिला भेटायचो
शब्दांचे नजराणे देयचो...
तिच्या विश्वात ....
फक्त ती आणि मी अन माझ्या कविता.
एवढेच काय ते आमचे जग.
ती स्वप्नातली परी...
लाजायची, रुसायची, भांडायची...
पण तिने मलाही समजून घेतले.
मला कधीच सोडून गेली नाही
तेव्हाही अन आजही.
मी मात्र वास्तविक विश्वात
भरकटलो...
स्वप्नातल्या परीला खर रूप
देया गेलो...
तेच प्रेम हिला मागायला गेलो
पण पदरी निराशा...
अर्ध्यावर डाव सोडून गेली ती
मी पर्ण खचलो...
जसे काही काव्यांचीपण साथ
सुटली...
पण पाठीवर तोच हात पुन्हा
मला सावरायला...
डोळ्यात अश्रूंचा काहूर माजला
तिला पाहून...
मी बदललो होतो ,
ती मात्र त्याच जागी माझी वाट
पाहत होती माझी,
मी परतेल या आशेवर
डोळा लावून बसली तीच ती माझी
स्वप्नपरी!!!!!! - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Sunday, April 15, 2012
!! करना देवा एक गर्लफ्रेंड दान. !!
" गोरी गोरी पान फुलासारखी छान "
Movie or Album: Baal Geete
Singer(s): Asha Bhosale
Music Director(s): Shrinewas Khale
Lyricist(s): G.D madgulkar
Movie or Album: Baal Geete
Singer(s): Asha Bhosale
Music Director(s): Shrinewas Khale
Lyricist(s): G.D madgulkar
मुळ गाणे सर्वाना माहित आहे. आपल्या लहानपणी आपण ते रेडीओ ऐकले असेल
गदिमांची माफ मागत हे बालगीत मी विडंबन प्रकारात केले आहे. तरी कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही
असल्यास क्षमस्व.
Labels:
विडंबन कविता

तुझा स्पर्श...
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Saturday, April 14, 2012
तिचा निरोप घेताना...
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

मलापण प्रेम हवंय ग... !
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Saturday, March 17, 2012
आता तरी थोडी विश्रांती घेवू देणा रे.
Labels:
इतर कविता / General Poems

Saturday, March 10, 2012
S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर
S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर
लेख लिहायला मलाना काहीही विषय पुरेसा असतो. एखादी गोष्ट मनात घर करून बसली की झाले त्यावर काहीतरी लिखाण करायचे हे नक्कीच होते माझे. आता हा लेख लिहायचे कारण माहित नाही पण जेपण लिहीन ते तुम्हाला आवडेल हे खात्रीने मी सांगू शकतो. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला कारण हे असतेच. तर हा लेख लिहायचे कारण आहेत S . T . महामंडळातील काही चालक. आता तुम्ही म्हणाल यात काय लिहायचे लेखाच्या नावावरून कळतेच आहे की ते फास्ट चालवत असणार गाडी म्हणून.
मला ही माहित आहे या एका ओळीतल्या गोष्टीला मी माझ्या शब्दात बांधून मांडेल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाल वा काय लिहिले आहे.आता बघा ना अजून मुळ मुद्द्याला सुरुवात झाली नाही तरी किती लिहून झाले. बर बर आता जास्त पण पकवत नाही तुम्हाला. तर करूया सुरुवात
मला जॉब लागला तेव्हा पासून माझा आणि S . T . महामंडळाचा संबंध आला आहे. म्हणजे गेले ३ वर्ष मी S . T . महामंडळाच्या सेवेचा वापर करतो आहे. महामंडळात खूप चालक आहे जे आता ओळखीचे झाले आहेत , हो म्हणजे चालकाला ओळखून आम्ही समजतो ही आपली गाडी आहे ते. माझा प्रवास हा भिवंडी ते बोरीवली असा आहे रोजचा ज्यात साधारण १.५ तास हा लागतोच, म्हणजे हे एकदम सरासरी आहे बरे. हान आता ट्राफिक असेल तर मात्र २ तासाच्या वरच लागतो.
काही चालक तर अक्षरशा वैताग आणतात त्या प्रवासाला , हो अहो ते इतके स्लो चालवतात की वीट येतो नुसता वाटते कधी पोचतो देव जाणे. आणि हे असे चालक २ तास घेतातच इच्छित स्थळी पोचवायला. खरतर आम्ही ना चालक बघून गाडीत बसतो कारण नंतर उगाच बोर होण्यापेक्षा न बसलेलेच बरे नाही का. पण कधी कधी नाईलाज असतो आमचापण.
हान आता S . T . महामंडळातील खरे हिरो ज्यांना आम्ही पायलट नाहीतर मायकल शुमाकर असे बोलवतो. अर्थात त्याला संदर्भ पण तसाच आहे. अहो हे पायलट न खरच कुशल आणि तरबेज आहेत गाडी चालवायला. हे सरासरी ज्या रोडने १.५ तास लागतो न त्याच रोडने १ तासाच्या आत गाडी आणतात बोला. आणि हे गाडी चालवत असताना तुम्हाला कितीही झोप आली असेल तरी तुम्ही झोपूच शकत नाही कारण ते इतके फास्ट चालवत असतात की कुठेतरी धरून बसावे लागते. ह्याला मागे टाक त्याला टाक करताना जी रेसिंग पाहायला मिळते ती वेगळीच आणि जोश भरणारी असते. जर तुम्ही कुठे धरून बसले नाही ना तर वळण मार्गावर बसल्या जागेवर आडवे झालात म्हणून समजा. आणि मुख्य म्हणजे यातल्या काहीना तर २५ वर्ष गाडी कुठे न धडकावता वा ठोकता S . T . महामंडळामध्ये सेवा केल्याबद्दल त्यांना बक्षीस मिळालेले आहे.
खरतर या गोष्टी तुम्हाला इतक्या महत्वाच्या नसतीलही पण माझ्या सारख्या रोज प्रवास करणाऱ्या मित्रांसाठी असेल कारण लवकर इच्छित स्थळी लवकर उतरणे सर्वात महत्वाचे नाही का. कालच मी फास्ट रेसिंग चा अनुभव घेतल्याने हा लेख लिहावा हे निश्चित झाले होते माझे. मला अशा आहे की तुम्हाला लेख नक्की आवडला असेल आणि तुम्ही हे वाचताना बोर झाला नसेल. चला परत भेटू नवीन विषयासोबत नाहीतर माझ्या कविता तर आहेतच तुमच्यासाठी. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Thursday, March 8, 2012
"शाळा" पाहिल्यानंतर
"शाळा"
खरच बोकिलांची "शाळा" भाग पडते आपल्याला शाळेत पुन्हा बसायला. पुन्हा सगळे ते क्षण आठवायला खरच भाग पडते ही "शाळा" ही कलाकृती विचार करायला. मी जेव्हा "शाळा" पाहत होतो खरच मलाही असे वाटत होते की मी त्या शाळेतला एक विद्यार्थी आहे.
वर्गात प्रार्थना असताना केलेली धमाल, खरच तसेच जसे काही सर्व आता समोर "शाळा" पाहताना वाटले. प्रार्थना करताना केलेल्या दंगेमुळे खाल्लेला मार ही आठवतो. प्रतिज्ञा चालू असताना हात दुखावल्या मुले समोरच्याच्या खांद्यावर हाताला थोडा आधार देणे असे अनेक किस्से आठवले. माझे ही शाळेतले दिवस अगदी जोश्या सारखेच होते. जोश्याच्या जगी मी स्वतः ला पहिले होते.
मला माझा गृहपाठ केला नाही तर मार बसेल की काय "शाळा" पाहताना वाटले. इतिहासाचा तास ज्यात मलाच वाचायला सांगायचे तेव्हा, वाटले की या "शाळेतले" सरपण मलाच सांगतील आता धडा वाच म्हणून. इंग्लिशची मात्र माझीही बोंब होती जशी यात सुऱ्या आणि पवार यांची होती. आम्हाला खास असे कुणी नव्हतेच इंग्लिश शिकवायला कुणीतरी येयचे काही दिवस शिकवायचे की जायचे, अन असेच वर्ष संपायचे.
विज्ञानच्या वर्गाला तर तेव्हा मैडम त्यांनी नवीन पद्धत काढली होती आम्ही मुलांनी आधीच उद्या शिकवणाऱ्या धड्याच वाचन करून येयचे, आणि दुसऱ्या दिवशी मैडम आधी आम्हाला प्रश्न विचारणार त्यातले आणि आम्ही उत्तर सांगायचे, अर्थात सुरुवातीला त्याचे काटेकोर पालन केले आम्ही, नंतर मात्र एक शक्कल केली , बाकाखाली पुस्तक धरून थोडासा संदर्भ घेवून मैडम ने विचरले त्याबद्दल थोडे बोलले की झाले, त्यामुळे मैडम च्या नजरेत आम्ही हुशार ठरलो होतो म्हणजे होतोच आम्ही.
शाळेत असताना आम्हाला आठवतंय जसे सुऱ्या आणि इतर त्यांच्या बाईंकडे बघायचे तसेच काहीसे आमचेही होते. आम्हाला एक बाई होत्या त्या खूप आवडायच्या, त्यांचा वर्ग चालू असताना आम्ही फक्त आ वासून त्यांना बघतच राहायचो अर्थात त्यांची नजर चुकवून.
आज "शाळा" पाहतानापण त्या सुऱ्या अन पवार यांच्यासोबत मागल्या बाकावर बसल्यासारखे वाटले.
जोश्याची जशी लाईन होती तशीच माझीपण होती बर का आणि जोश्याने मारलेला डायलॉग "आपल्या लाइन कड़े बघणे ही एक सुद्धा कला आहे, लाइन ला पण नाय कळला पाहिजे... की आपण तिच्याकडे बघतोय, समोर मैडम क़िवा सर आले ना... तरी पण, आपल्याला आपल्या लाइन कड़े बघता आला पाहिजे... कळला काय . . . " . अगदी तंतोतंत आहे. फक्त फरक एक होता जोश्याने शिरोडकरला बोलून दाखवले होते की ती त्याला आवडते , तेव्हा माझे काही धाडस झाले नव्हते सांगायचे.
शाळेतली गेलेली एकच ट्रिप सारखी आठवते, तेव्हा ५० /- मध्ये आम्हाला मुंबई दर्शन घडवले होते. नेहरू तारांगण, महालक्ष्मी , म्हातारीचा बूट , नेहरू उद्यान, हे सारे आठवते. या "शाळा" मधील त्यांचा गेलला कॅम्प याची आठवण करून देतो.
"शाळा" जेव्हा संपतो तेव्हा एक नवीन पडदा डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपल्याला आपल्या शाळेत घेवून जातो. शाळेतले सर्व दिवस नजरेसमोर उभे राहतात. " शाळा " जेव्हा शेवटला पोचतो तेव्हा मन उदास अन खिन्न होते, शिरोडकर ते गाव सोडून गेलेली असते , सुऱ्या अन पवार नापास झाल्याने जोश्या पासून वेगळे होतात. शेवटी एकटाच जोश्या राहतो. यांची पुढची कथा आपण जोडू पाहतो, पुढे असे होईल तसे होईल करून "शाळेचा" शेवट आपल्या परीने पूर्ण करतो.
- हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )
Labels:
लेखन / Marathi Lekhan

असाधारण ती
Labels:
इतर कविता / General Poems

Monday, March 5, 2012
पण तो लढतोय

Monday, February 20, 2012
सत्यात उतरलेले राशी भविष्य
सत्यात उतरलेले राशी भविष्य
नोट : ही कथा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित आहे , या घटनेतली पात्र खरी आहे त्यांचा जीवित व्यक्तींशी थेट संबंध आहे, काही साधर्म्य आढळल्यास तो योगायोगच समजावा.
ही कहाणी सुरु होते ती आपल्या हिरोचे ऑफिस सुटल्यानंतर, हिरो रोजच्याप्रमाणे आपल्या ऑफिसच्या मित्रांसोबत घरी जाण्यासाठी निघाला होता, साधारण वेळ असेल ७.१५ ते ७.३७ . हिरो मित्रांसोबत गोरेगाव स्टेशनला येतो. स्टेशनला पूर्वेकडून हिरो आणि त्याचे मित्र स्टेशन मध्ये प्रवेश करण्यासाठी नेहमी वापरत असलेल्या ब्रिजचा वापर करत असतात. हीरोचे मित्र पुढे ब्रिज चढत होते आणि आपला हिरो पाठीच होता.
हिरोच्या पाठीवर Sack होती. चढत असताना sack ला कुणी छेडत असल्याचे त्याला जाणवले, म्हणून हिरोने पाठी पाहिलं. हिरोने मागील व्यक्तींकडे लक्ष दिले तर जे होते ते आपल्याच नादात असल्याचे जाणवले जसे काही घडलेच नाही. त्याने Sack पहिले तर सर्वात बाहेरचा कप्पा होता, त्याची चैन ओपन होती. हिरोच्या चांगल्या लक्षात होते की त्याने ऑफिसचे ओळखपत्र त्या कप्प्यात ठेवून नीट चैन लावून बंद केले होते.
चोरी करण्याचा प्रयत्न हिरोच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा त्या गर्दीत पहिले तिथे संशय घेण्यासारखे कुणी दिसत नव्हते. कप्प्यात ओळखपत्र तसेच होते ते खात्री करून त्याने पुन्हा चैन लावली, तोपर्यंत त्याचा मित्रांना सगळा प्रकार कळला होता. पण ७.३७ ची ट्रेन असल्याने तिथे जास्त वेळ न थांबता ते निघाले गाडीसाठी.
हिरो काहीतरी आठवल्यासारखे झाले आणि त्याचा लक्षात आले की रविवारी आईने राशी भविष्याबाबत वाचून सांगितले होते की या सप्ताहात पाकीट चोरीपासून सावधान राहा म्हणून. हिरोला तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच भविष्या खरे झाल्याची अनुभूती आली होती.
-- समाप्त --
स्थळ : गोरेगाव स्टेशन
कलाकार : हिरो (मी स्वतः म्हणजे हर्षद कुंभार) , विलन : जो कुणी चोरी करण्याचा प्रयत्न करत होता तो , इतर : माझे मित्र आणि आजूबाजूची लोक
दिग्दर्शन : बहुतेक देवाने केले असावे. तो करता करविता नाही का.
संकल्पना : सकाळ पेपर राशीभविष्या
कथा ,पटकथा : हर्षद कुंभार
वितरक : फेसबुक , ब्लॉग
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Sunday, February 19, 2012
घ्या साहेब थोडी चिरी - मिरी / Corruption
Labels:
इतर कविता / General Poems

Saturday, February 18, 2012
मी एकटाच धावतोय
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita

Tuesday, February 14, 2012
शोध प्रेमाचा
शोध प्रेमाचा
१४ फेब , अगदी लहान थोरांपर्यंत सगळ्यांना ही तारीख फक्त valentine डे म्हणून परिचित आहे .
प्रेम काय असते . नक्की कशाला तुम्ही प्रेम म्हणता , नाही नाही मी इथे तुम्हाला त्याची व्याख्या सांगायला आलो नाही. हा फक्त माझ्या मनात असलेली प्रेमाबद्दलची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत आहे. नाही जमले ते तरी निदान त्याचे आजचे रूप मात्र तुम्हाला नक्कीच सांगीन.
आजचा तरुण वर्ग प्रेमाची ओळख त्यांनी भलतीच विचित्र तयार केली आहे. आजच्या या तरुण वर्गात प्रेमाला दिखावूपणाची जोड देण्यात आली आहे. आजची पिढी प्रेम कशी करते माहितेय काही उदाहरणे देतो तुम्हाला .
१) एकाच वर्गात शिकताना
२) एकाच ऑफिसमध्ये
३) एकाच ठिकाणी राहत असलेली
४ हल्लीच जन्माला आलेले इंटरनेट
आजची पिढी वरील एखाद्या माध्यमाशी जोडून असल्याने प्रेमात पडलेली आढळतील. आता मला सांगा दिवसातून खूप तास एखाद्या व्यक्ती सोबत राहिल्याने साहजिक त्याची सवय होते, त्याच्या हरेक गोष्टीची कल्पना येते, आवडी - निवडी कळतात. आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात चार हसरे क्षण घालवणारे कुणी असले की त्या व्यक्तीला आपण प्रेमात असल्याची अनुभती होते. म्हणजे बघा ना जी खर तर एक सवय असते त्याला ते प्रेम समजतो.
आता तुम्ही म्हणाल मग प्रेम म्हणायचे तरी कशाला. खर तर प्रेम ही एक कल्पना आहे जी विविध नात्यांमधून जन्माला येते.
अर्थात हे कितपत योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. पण माझ्या मते आई - मुल यांचे खरे प्रेमाचे नाते असते.
स्त्री ही एका जीवाला जन्म देते जी एक नैसर्गिक किमया आहे, त्यात खरे प्रेम असते. हा पण जो वर त्या मुलाला वं मुलीला अक्कल येत नाही तोवर ते प्रेम. कारण त्यांना अक्कल आली की ते दुसरे प्रेम शोधत असतात, काय बरोबर ना हसू नका खरच बोलत आहे मी.
पण आईचे तुम्ही एकच असता आणि शेवटपर्यंत. जावूद्या हा आईच्या प्रेमाचा मुद्दा खूप गहन आणि मोठा आहे , त्यावर पुन्हा केव्हा लिहीन.
महत्वाचे असे आहे की प्रेम म्हणजे नक्की काय जे आजच्या तरुण वर्गात प्रचलित आहे. मुलांना - मुलीना उमलत्या काळात भासणारी परी किव्वा राजकुमार हा स्वप्नापुरता असतो ज्याला कोणताच चेहरा नसतो, आपण तो चेहराच जनमानसात शोधत असतो. जेव्हा तसे कुणी मिळते तेव्हा त्या स्वप्नातल्या व्यक्तीला चेहरा मिळतो नाही का, पण तेही प्रेम आहे का
बरेच जन असे बोलतात की आयुष्यात प्रेम एकदाच होते मुळात मला हे पटत नाही. कारण भावना तीच असते ती कोणा एका चेहेरयाशी निगडीत का असावी. प्रेमाला कोणते रंग रूप लागत नाही, किव्वा सवयीला पण प्रेम म्हणते येत नाही. मग आता मला सांगा प्रेम म्हणजे काय
तुम्ही बोलाल एखाद्यावर जीव लावून प्रेम करणे, एकमेकांत एकरूप होणे याला प्रेम म्हणतात , खरच असे काही असते का. किती प्रेमीवीर जोडप्यांचे लग्न होते मला सांगा, आणि किती त्यात पूर्णपणे सुखी असतात, नाही नाही तुम्ही पुन्हा चुकतंय इथे मी अरेंगे मेरेज किव्वा लव मेरेग तफावत सांगत नाहीये, दोन्ही गोष्टीत नफे तोटे आहेतच की. मुळात एकनिष्ठ असे कोण असते प्रेमात आजच्या जगात सांगा ना .
प्रेमात असलेल्या खूप मुलांना मी विचारले ते म्हणतात अरे GF म्हणजे नुसता त्रास आहे यार , बर झाले तू प्रेमात नाहीस , म्हणजे याला काय म्हणायचे मग, मुळात प्रेम ही कल्पना सगळ्यांना झेपते का , की उगाच सगळे करतात म्हणून मी पण केले असे आहे ते.
बघा मी कुणाच्या विरुध्द बोलत नाही किव्वा कुणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण जे प्रश्न पडले त्या बद्दल तुम्हाला सांगावे म्हणून हा सगळा खटाटोप. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात.
- हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan

Subscribe to:
Posts (Atom)