All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, December 7, 2013

New Poem - Harshad Kumbhar

New Poem - Harshad Kumbhar


Sunday, December 1, 2013

Sachin Tendulkar...




                     क्रिकेट म्हणजे सचिन हे सर्वमान्य समीकरण बनले आहे. सचिनचा सामना पाहणे ही पर्वणीच असायची . जी मी देखील अनुभवली आहे .हल्लीच झालेल्या IPL स्पर्धांमधील MI V/s RCB सामना डोळ्यात साठवून ठेवला आहे , सचिनला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचा अविस्मरणीय आनंद घेता आला. सचिन मैदानात जरी आला ना मग ते प्रत्यक्ष खेळायला असो वा सराव असो, सचिन !!! सचिन !!! घोषाने स्टेडीयम दणाणून जाते. अंगावरच लव पेटून उठावे तसे रोम रोम जोशाने भरून उठते. प्रत्यक्ष हा अनुभव हजारो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडीयममध्ये घेतल्यानंतरच तुम्हाला कळेल. पण आता सचिन नसेल खेळायला असतील त्या फक्त त्याच्या आठवणी. आणि आठवणी कधीच रिटायर होत नाहीत. सचिन ने जेव्हा एकदिवसीय सामन्यात २०० केले तेव्हा त्याच्या गौरव प्रित्यर्थ एक कविता केली होती.

कधी शांत तर कधी खवळलेला…
आरसा हा समुद्राचा,
कधी  नम्र तर कधी कठोर…
स्वभाव या व्यक्तिमत्वाचा.

कधी गुणी शिष्य एका गुरूचा…
तर कधी गुरु हा नवोदितांचा,
कधी अपयशी तर कधी विजयी…
बादशाह हा विक्रमांचा.

दिसत असला लहान साधा तरी…
काळ सगळ्या गोलंदाजांचा,
निरंतर खेळत रहा तू सदैव…
हाच निरोप आहे प्रत्येक चाहत्याचा.

सातासमुद्रापार घेवून गेलास मराठीचे नाव…
हा परिणाम आहे तुझ्या विक्रमांचा,
ओळखायला क्षण आहे पुरेसा…
कारण तसा प्रवास आहे आपल्या सचिनचा.

सचिन तेंडूलकरचा असेल…
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान,
क्षितिजावर चमकणाऱ्या ताऱ्यासम…
सदैव असेल त्याचा सम्मान  - हर्षद कुंभार.          

  सचिनसम तोच, दुसरा सचिन होणे नाही…विविध वाक्यांनी सन्मानित कारकीर्द असलेला सचिन घरातला कोणी एक वाटतो. त्याच शांत आणि नम्र बोलन लक्ष वेधून घेते. सामान्य व्यक्तीमत्व असामान्य ओळख. अशी ओळख त्याच्या कारकिर्दीतल्या कर्तुत्वाने निर्माण केली आहे. त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेछ्या- हर्षद कुंभार                            

  

Saturday, October 26, 2013

रूढी -परंपरा , प्रथा संस्कार याला नवीन आधुनिक विज्ञानाची जोड देयला हवी



          एक गोष्ट जी सगळ्यांना काही गोष्ठीची अनुभूती करून देईल. आपण कुठे चुकतोय याची , आपण कोणत्या तत्वांवर, नियमांवर संस्कारांवर आपली घडी बसवली आहे याची. लहानपणापासून खूप गोष्टींचा बाऊ करून आपल्यावर संस्काराचे बाळकडू दिले जातात. तेच पूर्ण सत्य मानून आपण मोठे होतो आणि पुढेही तीच परंपरा चालू ठेवतो . त्यामुळे मोठ्यांना का म्हणून विचारले की ते वैतागतात किव्वा जेव्हडे सांगितले आहे तेवढेच लक्षात ठेवा बाकी चांभार चौकश्या नकोत. अशी जरब बसवली जाते. कारण त्यांनाही त्यामागचे शास्त्र माहित नसते अर्थात त्यांनाही दोष देण्यात काय अर्थ ना. ही परंपरा अशीच चालत आली आहे आणि राहील पण कदाचित.
      असो मुळात आता जी गोष्ट मी सांगणार आहे त्याने तुमच्या विचारांत बदल झाला तरी मला पुरुसे आहे. तर ही गोष्ट मी पुण्यात असताना वाचनात आली होती .

       "काही अभ्यासकांनी केलाला एक अभ्यास आहे त्यावरून घडलेली गोष्ट …
एका पिंजऱ्यात ५ माकडांना ठेवलेले असते. अभ्यासक नियमित त्या माकडांना केळी खायला देत असत. नंतर मग काही काळानंतर अभ्यासक त्यांना खायला देयला बंद करतात आणि पिंजऱ्याच्या मध्यभागी एक शिडी ठेवतात आणि पिंजऱ्याच्या वरच्या बाजूला केळी लटकवलेली दिसतील अशी ठेवतात. माकडांना कुठे काही खायला मिळत नाही, मग इथे तिथे पाहून अखेर त्यांना  केळी दिसतात आणि ते शिडी चढून केळी मिळवतात. अश्या प्रकारे त्या ५ माकडांना शिडी चढून केळी खायची सवयच लागते.
     आता अभ्यासक त्यांच्या या रोजच्या जगण्यात थोडा बदल करतात जेव्हापण ती माकडे त्या शिडीवर चढतील ना तेव्हा गरम पाण्याचा फवारा पिंजऱ्यात करतात. त्यामुळे गरम पाण्याने थोडं भाजायचे त्या माकडांना. माकडांच्या विचारशक्तीने त्यांच्या हे लक्षात येते की शिडी चढले की गरम पाणी अंगावर पडणार. त्यामुळे ती ५ माकडे शिडी चढायचा आप आपसात कोणालाच प्रयत्न करून देत नसत.
   आता अभ्यासक त्या ५ मधील ३ माकडे काढून नवीन ३ माकडे ठेवतात. त्यामुळे जुनी २ आणि नवीन ३ अशी ५ माकडे ठेवतात. त्यामुळे आता होते काय की हि नवीन ३ माकडे केळी खाण्यासाठी त्या शिडीजवळ जरी गेली तरी जूनी  २ माकडे त्यांना मारायची. असे सारखेच होऊ लागले.  त्या नवीन ३ माकडांना कळून चुकते शिडीजवळ काहीतरी आहे पण काय ते माहित नाही फक्त शिडी चढायची नाही किव्वा जवळ पण जायचे नाही हे मनाशी पक्के करून घेतात आणि शिडीजवळ जायचा नाद सोडतात.
    आता अभ्यासक पुन्हा बदल करतात जुन्या २ माकडांना कडून नवीन २ माकडांना पिंजऱ्यात ठेवतात म्हणजे आता २ नवीन माकडे आधीची नुकतीच ३ थोडी जुनी माकडे. तर आता पिंजरयातल्या नियमानुसार ही ३ माकडे त्या २ नवीन माकडांना पण त्या शिडीजवळ जाऊ देत नाहीत. त्यामुळे आता ५ ही माकडांना काहीच माहित नाही की शिडी जवळ गेल्यावर नक्की काय होते ते. फक्त एवढाच ना की काहीतरी असेल कदाचीत तिथे."
   तेव्हा आता तुम्ही विचार करा की हीच गोष्ट आपल्यासोबत पण झालीच आहे की नाही ते. रूढी - परंपरा या अश्याच पुढे आपल्यापर्यंत आल्या आहेत. मुळात त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार त्या रूढी-परंपरा जन्माला आलेल्या किव्वा बनवलेल्या गेल्या आहेत हे का आपल्या लक्षात येत नाही.

उदाहरण देयचे झाले तर आजही आपली वडिलधारी लोक आपल्याला सांगतात कि रात्रीची नखे कापू नये. आता का कुणालाच जास्त माहितपण नसेल.
   माझ्या माहितीनुसार जुन्याकाळी प्रकाशासाठी फक्त सूर्य हा एकच स्रोत्त्र होता अर्थात आग होती पण कोणी आग लावून नखे तर कापणार नाही न रात्री . रात्री अंधाराने नखे कापताना बोटांना इजा होऊ नये आणि कापून टाकलेली नखे कोणाच्या पायाला लागू नये हा त्यामागील उद्धेश होता. म्हणून रात्री नखे कपू नये हा नियम म्हणा की संस्कार लागू झाला तो आजवर तसाच आहे. अर्थात आपण आता प्रकाशासाठी सूर्यावर अवलंबून नाही पण आहे ते तसेच आहे ना.
या आणि अश्याच खूप गोष्टी आजही समाजमान्य अस्तित्वात आहेत. माझ्या मते आता आपण आपल्या रूढी -परंपरा , प्रथा संस्कार याला नवीन आधुनिक विज्ञानाची जोड देयला हवी त्यांचा अर्थ स्पष्ठ करण्याकरता. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)  
         

Sunday, October 20, 2013

Ek Kavita


किस्मत पर रोते हुए…
लोग अच्छे नही लगते ,
हात की लकीरोपें चले रस्ते…
पक्के नही लगते.

सिर्फ़ सच्चे दिल की
आवाज सुना करो…
क्योंकी प्यार की राह के फैसले
दिमाग सें नही लिया करते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Saturday, October 12, 2013

नैसर्गिक आपत्तीसम… प्रेम




खोल गहिऱ्या महासागरासम  
शांत निष्क्रिय जरी मी असलो … 
मनातल्या प्रेमाच्या लाटा मात्र 
तिच्या मनापर्यंत थडकत असतात. 

नैसर्गिक आपत्तीसम… 
जणू प्रेमसदृश्य मनाच्या क्रिया,
जश्या कोणीही रोखू शकत नाही … 
त्या प्रेम विरोधींना हतबल करूनच सोडतात. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).


प्रेमाचा उर्जास्त्रोत ....





त्यांना काय वाटत … 
भौतिक प्रेमाचा उर्जास्त्रोत बंद केल्याने … 
प्रेम म्हणून जन्माला…  
आलेले रोप वाढणार नाही,

वेडे आहेत रे ते लोक…  
त्यांना काय माहित … 
माणसाचं मन… 
स्वतःच एक उर्जास्त्रोत असते. - - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).

Ek Kavita...


Ek Kavita - Harshad Kumbhar


Saturday, August 17, 2013

आयुष्य आपले जरी







आयुष्यात स्वप्नांच्या 
शर्यतीत कधी कधी… 
अश्या वळणावर येवून 
थांबावे लागते की … 

आयुष्य आपले जरी 
असले ना तरी… 
त्याला चावी देयला
दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Wednesday, July 24, 2013

-- मन विचारंचे वादळ… --




                                                               -- मन विचारंचे वादळ…  --




मन विचारंचे वादळ…  
सदा सोबत घेवून फिरते,
स्वतः वसवलेला किनारा… 
कधी अचानक उध्वस्त करते. 

पुन्हा नव्याने मग… 
मनच पुन्हा किनारा वसवते,
स्वतःच उध्वस्त करणार…  
परी त्यास माहित असते.  -   हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)   

Saturday, July 20, 2013

प्रेमाचा रंग - सुगंध …